शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आणीबाणीवरून खडाजंगी; मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:56 IST

राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.

मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. राज्यात अघोषित आणीबाणी असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर भाजप नेत्यांनी बहिष्कार टाकला. राजकीय मेळावे, कार्यक्रम सुरू झाले असताना अधिवेशनाला विरोध, ही भूमिका अनाकलनीय आहे. मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात वेळ वाया जाण्याची शक्यता फडणवीस यांनी बोलून दाखविली. ओबीसींच्या प्रश्नावरूनही ठाकरे आणि फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला तर, ओबीसींच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रश्नच नाही. विरोधी पक्षांनी ओबीसींना उगाच चिथावणी देऊन सामाजिक सलोखा बिघडवू नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबई बँकेची चौकशी करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत, या फडणवीस यांच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले की कदाचित दरेकर यांना तुरुंगात टाकावे, असे फडणवीस यांना सुचवायचे असावे. फडणवीस यांना पक्षात कोण हवे, नको हे कळेनासे झाले आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.मुंबईत सर्वांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.महाविकास आघाडीतील पक्ष ठरवून राजकीय नाट्य करत आहेत. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक  विसंगत भूमिका वठविल्या जात आहेत. एक पक्ष बाजूने बोलतो, दुसरा विरोधात आणि तिसरा तटस्थ अशी विसंगत भूमिका रंगवली जात आहे. त्यातून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. कधी नव्हे ती आज राज्याची सामाजिक घडी विस्कटत आहे. राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झाला. या प्रश्नावर सरकारमध्ये एकवाक्यता नाही, गांभीर्य नाही.

देशात सध्या भयंकर स्थिती : ठाकरेमहाराष्ट्रात आणीबाणीची स्थिती असल्याचे फडणवीसांना वाटते, पण शेतकऱ्यांना अतिरेकी, पाकिस्तानी, चिनी म्हणणारे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर वागताहेत, त्यांच्या न्याय्य हक्कांबद्दल बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे, अशी जोरदार टीका ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचे फडणवीसांना वाटते, मग दिल्लीत जे चाललंय ते तर आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे, असे सांगत ठाकरे यांनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीतील आंदोलकांसमोर जाऊन सांगावे, असे आव्हान विरोधकांना दिले.देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आज पडलेला दिसत होता. विधान परिषद निवडणूक निकालाचा हा परिणाम दिसतो, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. राज्यात अघोषित आणीबाणी- देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरे तर ठाकरे सरकारला चपराक बसली तरीही कुणीही सरकारविरोधात बोलले की, त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.  फडणवीस यांनी शेतकरी, कोरोना काळातील बळी व भ्रष्टाचार, महिलांवरील वाढते अत्याचार, मराठा आणि ओबीसी आरक्षण तसेच विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली.  राजकीय आकसापोटी चांगल्या योजना बंद केल्या जात आहेत. समृद्धी महामार्गाला आधी विरोध केला. व आता त्याला बाळासाहेबांचे नाव दिले. हवे तर आमच्या सर्व प्रकल्पांना तुमची नावे द्या. पण, चांगल्या योजना चालू ठेवा, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस