शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

"राहुल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य टाकताहेत धोक्यात" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 18:16 IST

Shivraj Singh Chouhan And Rahul Gandhi : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तसेच लसीकरणावरही अधिकाधिक भर दिला जात आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, त्यानंतरच मन की बात करा, असं म्हटलं आहे. याच दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "राहुल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य धोक्यात टाकताहेत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"राहुल गांधी (Rahul Gandhi) हे गैरसमज आणि अफवा पसरवण्याचं करत असून कोरोना लसीकरणाबाबत (Vaccination) ते करत असलेली विधानं हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे" अशी टीका शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण पुरवत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी अफवा पसरवून देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं देखील मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून जोरदार टीका करताना दिसत आहेत. 

कोरोनाची दुसरी लाट, कोरोना लसीकरण, महागाई, जीएसटी, इंधनदरवाढ यांसारख्या विविध विषयांवरून राहुल गांधी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आणि कोरोना लसीकरणावरून राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. फक्त प्रत्येक देशवासीयांपर्यंत लस पोहोचवा, मग हवे असल्यास मन की बात पण सांगा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यासह लसीकरणाबाबतचे तथ्य आणि सत्य दर्शवणारा एक ग्राफही शेअर केला आहे. याशिवाय #VaccinateIndia हा हॅशटॅगही दिला आहे. 

पंतप्रधान मोदींकडून आढावा बैठक

देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला करोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, असे यावेळी सांगितले गेल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस