शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:02 IST

महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : लोकसभा निवडणुकीसाठी ५६ पक्ष एकत्रितपणे हातात हात घालून फोटोसेशन करीत असले तरी त्यांचे पायात पाय आहेत, हे जनतेने ओळखावे. अशा खेकड्याच्या प्रवृत्ती लोकसभेत पाठविण्यापेक्षा सीमेवरील जवानांना हिंमत देणारे देशहितासाठी झटणारे सरकार निवडा. महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.इचलकरंजी येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि गडहिंग्लज येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सभा झाल्या.ठाकरे म्हणाले, ज्या-ज्या वेळी देशाला काय करायचे, असा प्रश्न पडतो, त्यावेळी महाराष्टÑ पुढे येऊन नेतृत्व करतो आणि देशाला दिशा दाखवितो, याचा आपल्याला अभिमान पाहिजे.इचलकरंजी मॅँचेस्टरनगरी आहे. येथील वस्त्रोद्योगासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वस्त्रोद्योग दिमाखदारपणे उभा करूया. त्यासाठी तुम्ही धैर्यशीलला ताकद द्या. आम्ही व संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या उद्योगाचे प्रश्न सोडवेल. शिवसेनेने उद्योग वाढीसाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशीही शिवसेना नेहमीच राहते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच राहिली आहे. लग्नासाठी कर्जबाजारी होणाºया अनेक शेतकºयांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह शिवसेनेने लावून दिले. त्याचबरोबर यावेळी कर्जमाफी दिली, भविष्यात कर्जमुक्तही करू, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे