शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान बनण्यासाठी नितीश कुमार खेळताहेत अशी चाल, बिहारमध्ये मध्यावधी निवडणुका निश्चित"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 12:18 IST

Chirag Paswan Criticize Nitish Kumar: गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. लोकजनशक्ती पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर एकाकी पडलेल्या चिराग पासवान यांनी आता नितीश कुमार आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडण्यास सुरुवात केली आहे.

पाटणा - गेल्या काही दिवसांपासून बिहारच्याराजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. लोकजनशक्ती पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर एकाकी पडलेल्या चिराग पासवान यांनी आता नितीश कुमार आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नितीश कुमार हे पंतप्रधान बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपा आणि जेडीयूमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्कलह सुरू आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत लोकजनशक्ती पार्टीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे. (Chirag Paswan Criticize Nitish Kumar)

चिराग पासवान नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नितीश कुमार यांना पंतप्रधानपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र ते त्यांच्या मनातील गोष्ट अन्य नेत्यांच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. नितीश कुमार वारंवार भाजप आणि केंद सरकारविरोधात काम करत आहेत. त्यामुळेच भाजपा आणि जेडीयूमध्ये तणावाचे वातावरण आहे, असे चिराग पासवान म्हणाले.

त्यांनी सांगितले की, पेगासस प्रकरणात तपास करण्याची केंद्र सरकारची इच्छा नाही आहे. मात्र नितीश कुमार विरोधकांच्या सुरात सूर मिसळून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करत आहेत. तसेच जातींवर आधारित जनगणना, एनआरसी, लोकसंख्या नियंत्रण कायदा अशा  निर्णयावरून नितीश कुमार केंद्र आणि भाजपाला विरोध करून पंतप्रधान बनण्यासाठीच्या आपला सुप्त हेतूने आपली महत्त्वाकांक्षा एनडीएवर थोपवत आहे. नितीश कुमार यांची हीच महत्वाकांक्षा बिहारमध्ये मध्यावधी निवडणुकीचे कारण ठरेल, असा दावाही चिराग पासवान यांनी केला.

मागच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष एकटा निवडणूक लढला होता. तरीही पक्षाला सहा टक्के मते मिळाली होती. जर आम्ही सर्व जागा लढवल्या असत्या तर आमच्या मतांचा शेअर दुप्पट झाला असता, असेही ते म्हणाले. राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्याच्या अगदी विरुद्ध राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. दररोज हत्या घडताहेत. लोकप्रतिनिधीही येथे सुरक्षित नाहीत, असा टोलाही चिराग पासवान यांनी यावेळी लगावला

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारण