शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

"पंतप्रधान बनण्यासाठी नितीश कुमार खेळताहेत अशी चाल, बिहारमध्ये मध्यावधी निवडणुका निश्चित"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 12:18 IST

Chirag Paswan Criticize Nitish Kumar: गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. लोकजनशक्ती पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर एकाकी पडलेल्या चिराग पासवान यांनी आता नितीश कुमार आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडण्यास सुरुवात केली आहे.

पाटणा - गेल्या काही दिवसांपासून बिहारच्याराजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. लोकजनशक्ती पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर एकाकी पडलेल्या चिराग पासवान यांनी आता नितीश कुमार आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नितीश कुमार हे पंतप्रधान बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपा आणि जेडीयूमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्कलह सुरू आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत लोकजनशक्ती पार्टीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे. (Chirag Paswan Criticize Nitish Kumar)

चिराग पासवान नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नितीश कुमार यांना पंतप्रधानपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र ते त्यांच्या मनातील गोष्ट अन्य नेत्यांच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. नितीश कुमार वारंवार भाजप आणि केंद सरकारविरोधात काम करत आहेत. त्यामुळेच भाजपा आणि जेडीयूमध्ये तणावाचे वातावरण आहे, असे चिराग पासवान म्हणाले.

त्यांनी सांगितले की, पेगासस प्रकरणात तपास करण्याची केंद्र सरकारची इच्छा नाही आहे. मात्र नितीश कुमार विरोधकांच्या सुरात सूर मिसळून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करत आहेत. तसेच जातींवर आधारित जनगणना, एनआरसी, लोकसंख्या नियंत्रण कायदा अशा  निर्णयावरून नितीश कुमार केंद्र आणि भाजपाला विरोध करून पंतप्रधान बनण्यासाठीच्या आपला सुप्त हेतूने आपली महत्त्वाकांक्षा एनडीएवर थोपवत आहे. नितीश कुमार यांची हीच महत्वाकांक्षा बिहारमध्ये मध्यावधी निवडणुकीचे कारण ठरेल, असा दावाही चिराग पासवान यांनी केला.

मागच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष एकटा निवडणूक लढला होता. तरीही पक्षाला सहा टक्के मते मिळाली होती. जर आम्ही सर्व जागा लढवल्या असत्या तर आमच्या मतांचा शेअर दुप्पट झाला असता, असेही ते म्हणाले. राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्याच्या अगदी विरुद्ध राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. दररोज हत्या घडताहेत. लोकप्रतिनिधीही येथे सुरक्षित नाहीत, असा टोलाही चिराग पासवान यांनी यावेळी लगावला

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारण