शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जागा जिंकण्याचे काँग्रेसपुढे, तर भाजपापुढे टिकविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:08 IST

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले.

- राजेश भिसेनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले. उमेदवार निवडीसह इतर चुका सुधारून याच मतदारांच्या पाठिंब्यावर आगामी लोकसभा जिंकण्याचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहेत. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांनी या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. विधानसभांमध्ये मिळालेल्या यशापेक्षा मोठे यश काँग्रेसला मिळवून देणे, हे त्यांच्यापुढे आव्हान आहे. दुसरीकडे गेल्या वेळी विजय मिळवलेल्या लोकसभेच्या सर्व जागा या खेपेस टिकवून ठेवण्यासाठी भाजपाला कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनीच्या नेतृत्वाखाली भाजपाने कार्यकर्ते व बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांमार्फत तसे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी भाजपाची संपूर्ण टीम कामाला लागली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील २५ पैकी २५ जागांवर यश मिळविलेल्या भाजपासाठी यंदा लोकसभेच्या किमान १२ जागा धोक्यात असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष सचिन पायलट व प्रभारी रवींद्र दळवी यांनी गेल्या महिन्यापासून कार्यकर्ता प्रशिक्षण आणि आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.या निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला नसला तरी त्या कोणत्याही क्षणी जाहीर होतील, हे नक्की. तत्पूर्वी काँग्रेसतर्फे राज्यस्तरावर विधानसभानिहाय २५० कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर, बुथनिहाय नियोजन आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना बुथनिहाय नियोजन, पक्षाचे ध्येय धोरण व निवडणुकीतील व्यूहरचनेबाबत माहिती दिली जात आहे. त्यानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांना ध्येय धोरणे व निवडणूक धोरणाबाबतचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर राहणार आहे. गट, विभाग आणि जिल्हास्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊनच उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. राज्य सरकारने बेरोजगार भत्ता, सवर्ण आरक्षण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील कामांमुळे पक्षाचा जनाधार वाढेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.>उमेदवार निवडताना कस लागणारयंदा बिकानेर, श्रीगंगानगर-हनुमानगड आणि चुरू या मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष असून, मागील तीन ते चार निवडणुकांपासून या जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. त्या आपणास मिळाव्यात, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहे. या मतदारसंघांसह इतरही भागांत आरक्षणानुसार जातीनिहाय सक्षम उमेदवार निवडीचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rajasthanराजस्थान