शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

जागा जिंकण्याचे काँग्रेसपुढे, तर भाजपापुढे टिकविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:08 IST

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले.

- राजेश भिसेनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले. उमेदवार निवडीसह इतर चुका सुधारून याच मतदारांच्या पाठिंब्यावर आगामी लोकसभा जिंकण्याचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहेत. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांनी या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. विधानसभांमध्ये मिळालेल्या यशापेक्षा मोठे यश काँग्रेसला मिळवून देणे, हे त्यांच्यापुढे आव्हान आहे. दुसरीकडे गेल्या वेळी विजय मिळवलेल्या लोकसभेच्या सर्व जागा या खेपेस टिकवून ठेवण्यासाठी भाजपाला कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनीच्या नेतृत्वाखाली भाजपाने कार्यकर्ते व बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांमार्फत तसे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी भाजपाची संपूर्ण टीम कामाला लागली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील २५ पैकी २५ जागांवर यश मिळविलेल्या भाजपासाठी यंदा लोकसभेच्या किमान १२ जागा धोक्यात असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष सचिन पायलट व प्रभारी रवींद्र दळवी यांनी गेल्या महिन्यापासून कार्यकर्ता प्रशिक्षण आणि आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.या निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला नसला तरी त्या कोणत्याही क्षणी जाहीर होतील, हे नक्की. तत्पूर्वी काँग्रेसतर्फे राज्यस्तरावर विधानसभानिहाय २५० कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर, बुथनिहाय नियोजन आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना बुथनिहाय नियोजन, पक्षाचे ध्येय धोरण व निवडणुकीतील व्यूहरचनेबाबत माहिती दिली जात आहे. त्यानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांना ध्येय धोरणे व निवडणूक धोरणाबाबतचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर राहणार आहे. गट, विभाग आणि जिल्हास्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊनच उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. राज्य सरकारने बेरोजगार भत्ता, सवर्ण आरक्षण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील कामांमुळे पक्षाचा जनाधार वाढेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.>उमेदवार निवडताना कस लागणारयंदा बिकानेर, श्रीगंगानगर-हनुमानगड आणि चुरू या मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष असून, मागील तीन ते चार निवडणुकांपासून या जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. त्या आपणास मिळाव्यात, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहे. या मतदारसंघांसह इतरही भागांत आरक्षणानुसार जातीनिहाय सक्षम उमेदवार निवडीचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rajasthanराजस्थान