शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जागा जिंकण्याचे काँग्रेसपुढे, तर भाजपापुढे टिकविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:08 IST

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले.

- राजेश भिसेनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि शहरी मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले. उमेदवार निवडीसह इतर चुका सुधारून याच मतदारांच्या पाठिंब्यावर आगामी लोकसभा जिंकण्याचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहेत. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांनी या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. विधानसभांमध्ये मिळालेल्या यशापेक्षा मोठे यश काँग्रेसला मिळवून देणे, हे त्यांच्यापुढे आव्हान आहे. दुसरीकडे गेल्या वेळी विजय मिळवलेल्या लोकसभेच्या सर्व जागा या खेपेस टिकवून ठेवण्यासाठी भाजपाला कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनीच्या नेतृत्वाखाली भाजपाने कार्यकर्ते व बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांमार्फत तसे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी भाजपाची संपूर्ण टीम कामाला लागली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील २५ पैकी २५ जागांवर यश मिळविलेल्या भाजपासाठी यंदा लोकसभेच्या किमान १२ जागा धोक्यात असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष सचिन पायलट व प्रभारी रवींद्र दळवी यांनी गेल्या महिन्यापासून कार्यकर्ता प्रशिक्षण आणि आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.या निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला नसला तरी त्या कोणत्याही क्षणी जाहीर होतील, हे नक्की. तत्पूर्वी काँग्रेसतर्फे राज्यस्तरावर विधानसभानिहाय २५० कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर, बुथनिहाय नियोजन आदी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना बुथनिहाय नियोजन, पक्षाचे ध्येय धोरण व निवडणुकीतील व्यूहरचनेबाबत माहिती दिली जात आहे. त्यानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांना ध्येय धोरणे व निवडणूक धोरणाबाबतचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर राहणार आहे. गट, विभाग आणि जिल्हास्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊनच उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे. राज्य सरकारने बेरोजगार भत्ता, सवर्ण आरक्षण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील कामांमुळे पक्षाचा जनाधार वाढेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.>उमेदवार निवडताना कस लागणारयंदा बिकानेर, श्रीगंगानगर-हनुमानगड आणि चुरू या मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष असून, मागील तीन ते चार निवडणुकांपासून या जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. त्या आपणास मिळाव्यात, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहे. या मतदारसंघांसह इतरही भागांत आरक्षणानुसार जातीनिहाय सक्षम उमेदवार निवडीचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rajasthanराजस्थान