शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

केंद्र सरकार लुटारू आणि खोटारडे- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:05 IST

कसाऱ्यातील जाहीर सभेत टीका

कसारा : काळे पैसेवाल्यांना लुटण्यासाठी नोटा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, हे सरकार लुटारू व खोटारडे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कसारा येथील जाहीर सभेत केला.शहापूर तालुक्यातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे कायम पाणीटंचाई असते. त्यामुळे येथे सिंचन योजना राबवता येत नाहीत. येथील लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती नसल्याने येथील जमीन ओसाड पडली आहे. ग्रामीण भागाची भौगोलिक परिस्थिती पाहता, येथे कृषीवर आधारित व्यवसाय सुरू करून येथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची गरज आहे. या भागात दुग्धसंकलन केंद्र व भाजीपाला व्यवसाय सुरू केल्यास येथे मोठी बाजारपेठ निर्माण होऊन जोडव्यवसाय आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते; पण शासन त्यानुसार योजनाच राबवत नसल्याने येथील लोक शहराकडे रोजगारासाठी जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. सभेला भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाढविंदे, कसारा शहराध्यक्ष अमीर भरीत, प्रकाश घेगडे व एमआयएमचे कार्यकर्ते उपस्थित होते.आजी, माजी खासदार धनदांडग्यांचेभिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील व माजी खासदार सुरेश टावरे यांच्यावर टीका करताना, काँग्रेसच्या राजवटीत खासदार टावरे यांनी फक्त स्वत:चा विकास केला. गोरगरीब, शेतकरीवर्गासाठी काहीही केले नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सुरेश टावरे यांना जाणीव असती, तर त्यांनी किमान एखादा दुग्ध प्रकल्प या भागात उभारला असता. त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरातहून महाराष्ट्राला होणारा दूधपुरवठा बंद झाला असता आणि येथील शेतकरी समृद्ध झाले असते, असे आंबेडकर या वेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा