शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

केंद्र सरकार लुटारू आणि खोटारडे- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:05 IST

कसाऱ्यातील जाहीर सभेत टीका

कसारा : काळे पैसेवाल्यांना लुटण्यासाठी नोटा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, हे सरकार लुटारू व खोटारडे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कसारा येथील जाहीर सभेत केला.शहापूर तालुक्यातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे कायम पाणीटंचाई असते. त्यामुळे येथे सिंचन योजना राबवता येत नाहीत. येथील लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती नसल्याने येथील जमीन ओसाड पडली आहे. ग्रामीण भागाची भौगोलिक परिस्थिती पाहता, येथे कृषीवर आधारित व्यवसाय सुरू करून येथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची गरज आहे. या भागात दुग्धसंकलन केंद्र व भाजीपाला व्यवसाय सुरू केल्यास येथे मोठी बाजारपेठ निर्माण होऊन जोडव्यवसाय आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते; पण शासन त्यानुसार योजनाच राबवत नसल्याने येथील लोक शहराकडे रोजगारासाठी जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. सभेला भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाढविंदे, कसारा शहराध्यक्ष अमीर भरीत, प्रकाश घेगडे व एमआयएमचे कार्यकर्ते उपस्थित होते.आजी, माजी खासदार धनदांडग्यांचेभिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील व माजी खासदार सुरेश टावरे यांच्यावर टीका करताना, काँग्रेसच्या राजवटीत खासदार टावरे यांनी फक्त स्वत:चा विकास केला. गोरगरीब, शेतकरीवर्गासाठी काहीही केले नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सुरेश टावरे यांना जाणीव असती, तर त्यांनी किमान एखादा दुग्ध प्रकल्प या भागात उभारला असता. त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरातहून महाराष्ट्राला होणारा दूधपुरवठा बंद झाला असता आणि येथील शेतकरी समृद्ध झाले असते, असे आंबेडकर या वेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा