शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केंद्र सरकार लुटारू आणि खोटारडे- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:05 IST

कसाऱ्यातील जाहीर सभेत टीका

कसारा : काळे पैसेवाल्यांना लुटण्यासाठी नोटा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, हे सरकार लुटारू व खोटारडे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कसारा येथील जाहीर सभेत केला.शहापूर तालुक्यातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे कायम पाणीटंचाई असते. त्यामुळे येथे सिंचन योजना राबवता येत नाहीत. येथील लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती नसल्याने येथील जमीन ओसाड पडली आहे. ग्रामीण भागाची भौगोलिक परिस्थिती पाहता, येथे कृषीवर आधारित व्यवसाय सुरू करून येथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची गरज आहे. या भागात दुग्धसंकलन केंद्र व भाजीपाला व्यवसाय सुरू केल्यास येथे मोठी बाजारपेठ निर्माण होऊन जोडव्यवसाय आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते; पण शासन त्यानुसार योजनाच राबवत नसल्याने येथील लोक शहराकडे रोजगारासाठी जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. सभेला भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाढविंदे, कसारा शहराध्यक्ष अमीर भरीत, प्रकाश घेगडे व एमआयएमचे कार्यकर्ते उपस्थित होते.आजी, माजी खासदार धनदांडग्यांचेभिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील व माजी खासदार सुरेश टावरे यांच्यावर टीका करताना, काँग्रेसच्या राजवटीत खासदार टावरे यांनी फक्त स्वत:चा विकास केला. गोरगरीब, शेतकरीवर्गासाठी काहीही केले नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सुरेश टावरे यांना जाणीव असती, तर त्यांनी किमान एखादा दुग्ध प्रकल्प या भागात उभारला असता. त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरातहून महाराष्ट्राला होणारा दूधपुरवठा बंद झाला असता आणि येथील शेतकरी समृद्ध झाले असते, असे आंबेडकर या वेळी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा