शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेस आणि भाजपातर्फे उमेदवारांची चाचपणी वेगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:08 IST

या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, असे दिसत आहे. मध्य प्रदेशात यंदाची लढाई मुख्यत: काँग्रेस व भाजपामध्येच आहे.

- प्रसाद कुलकर्णीया आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, असे दिसत आहे. मध्य प्रदेशात यंदाची लढाई मुख्यत: काँग्रेस व भाजपामध्येच आहे. मोदी लाटेचा प्रभाव लुप्त झाल्याचे विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले आहे. तरीही २६ फेब्रुवारीच्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न देशभर भाजपा करणार असून, हीच काँग्रेससमोर डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.पाकिस्तानविरुद्ध अशी लष्करी कारवाई करण्याचे धारिष्ट्य इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदींनी दाखविले. त्यामुळे त्या प्रचारावरून जनतेचे मन वळविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्नांपेक्षा हाच मुद्दा कळीचा ठरतो की काय, असे वाटत आहे. पण मतदानाला वेळ असल्याने मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडू शकतात.विधानसभा निवडणुकीतील विजय ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विन २९ हे मिशन ठरविले आहे. म्हणजे सर्व जागा जिंकण्याची काँग्रेसची महत्त्वाकांक्षी इच्छा व योजना आहे. अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले तर त्याच्या जवळ तरी जाता येते. अर्थात त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त अन् जनतेचा कौल हवा. त्यामुळे काँग्रेस विचारपूर्वक नियोजनबद्ध पाऊले टाकत आहे.भिंड, ग्वाल्हेर व सीधीमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बैठका घेतल्या. सध्या ते ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांची मते ऐकून घेत आहेत. त्यानंतरच ते या तीन मतदारसंघांचे उमेदवार ठरवतील. ग्वाल्हेर, चंबळ, अंचल या पट्यातील विभानसभेच्या ३४ पैकी २६ काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. जनमताचा हाच कौल लोकसभेत कायम ठेवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे एक हुकमी एक्का मानले जाणारे उमेदवार. ते स्वत: गुना मतदारसंघासाठी इच्छुक असले तरी काँग्रेस त्यांना ग्वाल्हेरमधून उभे करू इच्छिते. गुना- शिवपुरी मतदारसंघासाठी प्रियदर्शनी राजे यांचे पारडे जड वाटते. त्यांचा जनसंपर्क पाहता पक्षश्रेष्ठी त्यांनाच अनुकूल आहेत. भिंड, सीधी व खजुराहोबाबत कमलनाथ १ मार्च रोजी उमेदवार निश्चितीबाबत अंदाज घेतील. सीधीतून कमलेश्वर पटेल, भिंडमधून महेंद्र जाटव तर खजुराहोमधून भाजपातून आलेले रामकृष्ण कुसमरिया हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतील. जेथे काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुढील आठवड्यात राज्यात १0 ते १२ सभा घेण्याची शक्यता आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाही तयारीत मागे नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनांनंतर वरिष्ठ नेत्यांनी विद्यमान खासदारांचा लेखाजोखा तयार केला. त्यात २७ पैकी १४ खासदार नापास झाल्याने त्यांचा पत्ता ‘कट’ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कामांचे डांगोरे पिटत राहण्याच्या सूचना पाळण्यात हे खासदार अपयशी ठरले आणि निष्क्रियही होते, अशी तक्रार आहे.भिंडचे भागीरथप्रसाद, सागरचे लक्ष्मीनारायण यादव, मंदसौरचे सुधीर गुप्ता, भोपाळचे अलोक संजर, राजगढचे रोडमल नागर, होशिंगाबादचे उदयप्रताप सिंग, रिवा येथील जनार्दन मिश्रा, सीधी येथील रीती पाठक, उज्जैनचे चिंतामणी मालवीय, धारच्या सावित्री ठाकूर, मुरैनाचे अनुप मिश्रा खरगोनचे सुभाष पटेल यांच्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे नवे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भाजपाकडे हे हौशे, गवशे, नवशे आपले तुणतुणे वाजवत आहेत.अर्थात भाजपची ‘थिंक टँक’ समजले जाणारे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रदेश प्रभारी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासारख्या शांत नेत्याकडे उमेदवार निवडीची सूत्रे आहेत. ते अशा मंडळींना जवळ करण्याची शक्यता कमीच. तरीही भाजपाला बंडाळीला तोंड द्यावे लागेल आणि मतविभागणीचा फायदा आपल्याला होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. भाजपला उमेदवार निवडीबाबत रा.स्व. संघही ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची मने जाणून घेऊन मदत करीत आहे.>‘ताई’ विरुद्ध ‘भाई’भाजपामध्ये सर्वाधिक चुरस इंदोरसाठी आहे. ताई म्हणून ओळखल्या जाणाºया सुमित्रा महाजन या ९ वेळा इथून विजयी झाल्या असल्या तरी आता त्यांना कडवे आव्हान भाई म्हणून ओळखले जाणारे कैलास विजयवर्गीय यांनी दिले आहे. गेल्या वेळी ताई म्हणाल्या होत्या की, इंदोर लोकसभेची चावी माझ्या हाती आहे. योग्य वेळी मी योग्य व्यक्तीकडे ती सुपूर्द करीन. पाऊणशे वय असलेल्या ताई अजूनही चावी सोडायला तयार नाहीत. कैलास विजयवर्गीय दांडगा जनसंपर्क असलेले प्रबळ उमेदवार आहेत. त्यांना दुखवणे पक्षश्रेष्ठींना परवडणारे नाही. पर्यायाने तिकिटासाठी ओढाताण झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्यामुळे इंदोरचा उमेदवार ठरविणे, ही भाजपासाठी डोकेदुखी आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९