शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:16 IST

५ आमदार फुटले; मात्र काँग्रेस म्हणते, जनता आमच्या मागे

- धनंजय वाखारेगुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गडावरून काँगे्रसने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून भाजपापुढे आव्हान उभे केले असतानाच भाजपानेगुजरातमधीलकाँग्रेसचे आमदार गळाला लावून कॉँग्रेसला कमकुवत करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसचे पाच आमदार भाजपावासी झाले आहेत. त्यातील एकाला भाजपाने कॅबिनेट मंत्रिपदही बहाल केले आहे.गेल्या आठवड्यातच काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. त्यापूर्वी दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. सन २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने भाजपापुढे जबरदस्त आव्हान उभे करत मोदींच्या होम ग्राउंडवरच भाजपाची दमछाक केली होती.त्यानंतर, काँग्रेससह विरोधकांचा भाजपाविरोधी उत्साह अधिकच दुणावला होता. परिणामी, भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसला होता. या पराभवाने भानावर आलेल्या भाजपाने आता कॉँग्रेसला कमजोर करण्याचे तंत्र अवलंबिले असून, गुजरातमधील काँग्रेसच्या पाच आमदारांना गळाला लावले आहे. त्यात, कुंवरजी बावलिया, आशा पटेल, जवाहर चावडा, पुरुषोत्तम सावरिया आणि वल्लभ धारविया यांचा समावेश आहे. या पाच आमदारांबरोबरच काँगे्रसने आणखी एक आमदार गमावला आहे.अवैध खाणप्रकरणी कॉँग्रेसचे आमदार भगवान बराड यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्याने गुजरात विधानसभेत त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे. काँग्रेसचे ६ आमदार कमी झाल्याने आता काँग्रेसची संख्या ७७ वरून ७१वर येऊन पोहोचली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कुंवरजी बावलिया यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. मागील महिन्यात पहिल्यांदा गुजरात विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आशा पटेल यांनीही विधानसभा सदस्य आणि कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता गेल्या सप्ताहात कॉँग्रेसचे आणखी तीन आमदार भाजपाच्या गळाला लागले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आता कॉँग्रेसवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, गुजरातमधील कॉँग्रेसमध्ये फोडाफोडीचे तंत्र अवलंबत पक्षाला कमजोर करण्याची तयारी आरंभली असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत कॉँग्रेसमधील नाराज गटाला भाजपाकडे खेचण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे वृत्त आहे.काँग्रेसला मात्र आत्मविश्वासकाँग्रेसचे पाच आमदार भाजपात गेले असले तरी काँग्रेसला त्याची चिंता दिसत नाही. आमदार फुटतील, पण जनता आमच्या बाजूने आहे. ते विधानसभा निवडणुकीतही सिद्ध झाले आहे.आता हार्दिक पटेल हेही काँग्रेसमध्ये आले आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईल. आमदार भाजपामध्ये गेल्याने जनता भाजपाकडे वळली असे समजू नये. यंदा आम्हीच भाजपापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा मिळवू, असा दावा काँग्रेस नेते करीत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाल्याचे व त्यांच्यात आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :GujaratगुजरातLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस