शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:16 IST

५ आमदार फुटले; मात्र काँग्रेस म्हणते, जनता आमच्या मागे

- धनंजय वाखारेगुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गडावरून काँगे्रसने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून भाजपापुढे आव्हान उभे केले असतानाच भाजपानेगुजरातमधीलकाँग्रेसचे आमदार गळाला लावून कॉँग्रेसला कमकुवत करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसचे पाच आमदार भाजपावासी झाले आहेत. त्यातील एकाला भाजपाने कॅबिनेट मंत्रिपदही बहाल केले आहे.गेल्या आठवड्यातच काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. त्यापूर्वी दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. सन २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने भाजपापुढे जबरदस्त आव्हान उभे करत मोदींच्या होम ग्राउंडवरच भाजपाची दमछाक केली होती.त्यानंतर, काँग्रेससह विरोधकांचा भाजपाविरोधी उत्साह अधिकच दुणावला होता. परिणामी, भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसला होता. या पराभवाने भानावर आलेल्या भाजपाने आता कॉँग्रेसला कमजोर करण्याचे तंत्र अवलंबिले असून, गुजरातमधील काँग्रेसच्या पाच आमदारांना गळाला लावले आहे. त्यात, कुंवरजी बावलिया, आशा पटेल, जवाहर चावडा, पुरुषोत्तम सावरिया आणि वल्लभ धारविया यांचा समावेश आहे. या पाच आमदारांबरोबरच काँगे्रसने आणखी एक आमदार गमावला आहे.अवैध खाणप्रकरणी कॉँग्रेसचे आमदार भगवान बराड यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्याने गुजरात विधानसभेत त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे. काँग्रेसचे ६ आमदार कमी झाल्याने आता काँग्रेसची संख्या ७७ वरून ७१वर येऊन पोहोचली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कुंवरजी बावलिया यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. मागील महिन्यात पहिल्यांदा गुजरात विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आशा पटेल यांनीही विधानसभा सदस्य आणि कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता गेल्या सप्ताहात कॉँग्रेसचे आणखी तीन आमदार भाजपाच्या गळाला लागले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आता कॉँग्रेसवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, गुजरातमधील कॉँग्रेसमध्ये फोडाफोडीचे तंत्र अवलंबत पक्षाला कमजोर करण्याची तयारी आरंभली असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत कॉँग्रेसमधील नाराज गटाला भाजपाकडे खेचण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे वृत्त आहे.काँग्रेसला मात्र आत्मविश्वासकाँग्रेसचे पाच आमदार भाजपात गेले असले तरी काँग्रेसला त्याची चिंता दिसत नाही. आमदार फुटतील, पण जनता आमच्या बाजूने आहे. ते विधानसभा निवडणुकीतही सिद्ध झाले आहे.आता हार्दिक पटेल हेही काँग्रेसमध्ये आले आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईल. आमदार भाजपामध्ये गेल्याने जनता भाजपाकडे वळली असे समजू नये. यंदा आम्हीच भाजपापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा मिळवू, असा दावा काँग्रेस नेते करीत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाल्याचे व त्यांच्यात आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :GujaratगुजरातLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस