शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:16 IST

५ आमदार फुटले; मात्र काँग्रेस म्हणते, जनता आमच्या मागे

- धनंजय वाखारेगुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गडावरून काँगे्रसने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून भाजपापुढे आव्हान उभे केले असतानाच भाजपानेगुजरातमधीलकाँग्रेसचे आमदार गळाला लावून कॉँग्रेसला कमकुवत करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसचे पाच आमदार भाजपावासी झाले आहेत. त्यातील एकाला भाजपाने कॅबिनेट मंत्रिपदही बहाल केले आहे.गेल्या आठवड्यातच काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. त्यापूर्वी दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. सन २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने भाजपापुढे जबरदस्त आव्हान उभे करत मोदींच्या होम ग्राउंडवरच भाजपाची दमछाक केली होती.त्यानंतर, काँग्रेससह विरोधकांचा भाजपाविरोधी उत्साह अधिकच दुणावला होता. परिणामी, भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसला होता. या पराभवाने भानावर आलेल्या भाजपाने आता कॉँग्रेसला कमजोर करण्याचे तंत्र अवलंबिले असून, गुजरातमधील काँग्रेसच्या पाच आमदारांना गळाला लावले आहे. त्यात, कुंवरजी बावलिया, आशा पटेल, जवाहर चावडा, पुरुषोत्तम सावरिया आणि वल्लभ धारविया यांचा समावेश आहे. या पाच आमदारांबरोबरच काँगे्रसने आणखी एक आमदार गमावला आहे.अवैध खाणप्रकरणी कॉँग्रेसचे आमदार भगवान बराड यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्याने गुजरात विधानसभेत त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे. काँग्रेसचे ६ आमदार कमी झाल्याने आता काँग्रेसची संख्या ७७ वरून ७१वर येऊन पोहोचली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कुंवरजी बावलिया यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. मागील महिन्यात पहिल्यांदा गुजरात विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आशा पटेल यांनीही विधानसभा सदस्य आणि कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता गेल्या सप्ताहात कॉँग्रेसचे आणखी तीन आमदार भाजपाच्या गळाला लागले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आता कॉँग्रेसवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, गुजरातमधील कॉँग्रेसमध्ये फोडाफोडीचे तंत्र अवलंबत पक्षाला कमजोर करण्याची तयारी आरंभली असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत कॉँग्रेसमधील नाराज गटाला भाजपाकडे खेचण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे वृत्त आहे.काँग्रेसला मात्र आत्मविश्वासकाँग्रेसचे पाच आमदार भाजपात गेले असले तरी काँग्रेसला त्याची चिंता दिसत नाही. आमदार फुटतील, पण जनता आमच्या बाजूने आहे. ते विधानसभा निवडणुकीतही सिद्ध झाले आहे.आता हार्दिक पटेल हेही काँग्रेसमध्ये आले आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईल. आमदार भाजपामध्ये गेल्याने जनता भाजपाकडे वळली असे समजू नये. यंदा आम्हीच भाजपापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा मिळवू, असा दावा काँग्रेस नेते करीत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाल्याचे व त्यांच्यात आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :GujaratगुजरातLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस