शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कपिल पाटलांच्या मंत्रिपदामुळ भिवंडीत भाजपाचे वर्चस्व वाढले, काँग्रेस, शिवसेनेसमोर तगडे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:18 IST

Kapil Patil News; खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी पाटील यांनी यावेळी नमूद केले. केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्यासाठीच खा कपिल पाटील यांना केंद्राने ताकद दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

कपिल पाटील यांचीकेंद्रीयमंत्रीपदी वर्णी लागल्याने ठाणे जिल्ह्याबरोबरच खा कपिल पाटील हे नेतृत्व करीत असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर देखील आता भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण खा.कपिल पाटील यांच्याशी राजकीय मुकाबला करणारा एकही चेहरा सध्या तरी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे नाही. त्यातच खा. कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सुरेश म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेकडे देखील ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागा बरोबरच भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा नाही. तसेच यापूर्वी भिवंडी लोकसभा मतदार संघ हा मुस्लिम बहुल मतदार संघ असल्याने आतापर्यंत या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून हा मतदार संघ भाजपचे खा कपिल पाटील यांनी जिंकला असून आता ते थेट केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा काँग्रेसकडे नसल्याने काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान ठरणार आहे. त्यातच काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांकडे सध्या तरी तसा उमेदवार अथवा चेहरा नाही. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचाच बोलबाला राहणार यात सुतमात्र शंका नाही.

महाविकास आघाडीला जर खा कपिल पाटील यांचा राजकीय अश्व थोपवायचे असेल तर काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना एकत्र येऊनच किमान भिवंडी लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवीने गरजेचे होणार असून केंद्रीय मंत्री असलेल्या खा.कपिल पाटील यांच्या समोर उमेदवार द्यायचे झाल्यास त्या उमेदवाराला देखील महाविकास आघाडीने राजकीय ताकद देणे गरजेचे होणार आहे. अन्यथा केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांच्या समोर सामान्य उमेदवाराचा टिकाव लागणार नाही असे मत देखील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात सध्यातरी भाजपचाच बोलबाला असून भाजप आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावणार यात देखील शंका नाही. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून महाविकास आघाडी यातून नेमकी कशी तोडगा काढणार हे येणार काळच ठरवणार आहे. 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडीthaneठाणे