शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कपिल पाटलांच्या मंत्रिपदामुळ भिवंडीत भाजपाचे वर्चस्व वाढले, काँग्रेस, शिवसेनेसमोर तगडे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:18 IST

Kapil Patil News; खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी पाटील यांनी यावेळी नमूद केले. केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्यासाठीच खा कपिल पाटील यांना केंद्राने ताकद दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

कपिल पाटील यांचीकेंद्रीयमंत्रीपदी वर्णी लागल्याने ठाणे जिल्ह्याबरोबरच खा कपिल पाटील हे नेतृत्व करीत असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर देखील आता भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण खा.कपिल पाटील यांच्याशी राजकीय मुकाबला करणारा एकही चेहरा सध्या तरी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे नाही. त्यातच खा. कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सुरेश म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेकडे देखील ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागा बरोबरच भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा नाही. तसेच यापूर्वी भिवंडी लोकसभा मतदार संघ हा मुस्लिम बहुल मतदार संघ असल्याने आतापर्यंत या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून हा मतदार संघ भाजपचे खा कपिल पाटील यांनी जिंकला असून आता ते थेट केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा काँग्रेसकडे नसल्याने काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान ठरणार आहे. त्यातच काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांकडे सध्या तरी तसा उमेदवार अथवा चेहरा नाही. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचाच बोलबाला राहणार यात सुतमात्र शंका नाही.

महाविकास आघाडीला जर खा कपिल पाटील यांचा राजकीय अश्व थोपवायचे असेल तर काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना एकत्र येऊनच किमान भिवंडी लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवीने गरजेचे होणार असून केंद्रीय मंत्री असलेल्या खा.कपिल पाटील यांच्या समोर उमेदवार द्यायचे झाल्यास त्या उमेदवाराला देखील महाविकास आघाडीने राजकीय ताकद देणे गरजेचे होणार आहे. अन्यथा केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांच्या समोर सामान्य उमेदवाराचा टिकाव लागणार नाही असे मत देखील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात सध्यातरी भाजपचाच बोलबाला असून भाजप आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावणार यात देखील शंका नाही. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून महाविकास आघाडी यातून नेमकी कशी तोडगा काढणार हे येणार काळच ठरवणार आहे. 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडीthaneठाणे