शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कपिल पाटलांच्या मंत्रिपदामुळ भिवंडीत भाजपाचे वर्चस्व वाढले, काँग्रेस, शिवसेनेसमोर तगडे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:18 IST

Kapil Patil News; खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

- नितिन पंडीत

भिवंडी - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी पाटील यांनी यावेळी नमूद केले. केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. खा.कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह भिवंडी लोकसभा मतदार संघावर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्यासाठीच खा कपिल पाटील यांना केंद्राने ताकद दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

कपिल पाटील यांचीकेंद्रीयमंत्रीपदी वर्णी लागल्याने ठाणे जिल्ह्याबरोबरच खा कपिल पाटील हे नेतृत्व करीत असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर देखील आता भाजपचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण खा.कपिल पाटील यांच्याशी राजकीय मुकाबला करणारा एकही चेहरा सध्या तरी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडे नाही. त्यातच खा. कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सुरेश म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेकडे देखील ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागा बरोबरच भिवंडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा नाही. तसेच यापूर्वी भिवंडी लोकसभा मतदार संघ हा मुस्लिम बहुल मतदार संघ असल्याने आतापर्यंत या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून हा मतदार संघ भाजपचे खा कपिल पाटील यांनी जिंकला असून आता ते थेट केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांचा राजकीय मुकाबला करणारा चेहरा काँग्रेसकडे नसल्याने काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान ठरणार आहे. त्यातच काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांकडे सध्या तरी तसा उमेदवार अथवा चेहरा नाही. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचाच बोलबाला राहणार यात सुतमात्र शंका नाही.

महाविकास आघाडीला जर खा कपिल पाटील यांचा राजकीय अश्व थोपवायचे असेल तर काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना एकत्र येऊनच किमान भिवंडी लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवीने गरजेचे होणार असून केंद्रीय मंत्री असलेल्या खा.कपिल पाटील यांच्या समोर उमेदवार द्यायचे झाल्यास त्या उमेदवाराला देखील महाविकास आघाडीने राजकीय ताकद देणे गरजेचे होणार आहे. अन्यथा केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांच्या समोर सामान्य उमेदवाराचा टिकाव लागणार नाही असे मत देखील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदार संघात सध्यातरी भाजपचाच बोलबाला असून भाजप आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावणार यात देखील शंका नाही. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून महाविकास आघाडी यातून नेमकी कशी तोडगा काढणार हे येणार काळच ठरवणार आहे. 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडीthaneठाणे