शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

“ज्याची अनेक दिवस होती चर्चा, ‘ती’ गोष्ट आता सत्यात उतरणार; भाजपा खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 20:21 IST

माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती असं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

ठळक मुद्देमतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे.माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही

सातारा – भारतीय जनता पार्टीमुळे मी पहिल्यांदा खासदार झालो, अल्पावधीतच माझ्या नावाची चर्चा केंद्रीय मंत्रिपदासाठी झाली. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही, कार्यकर्त्यांनीही नाराज होऊ नका अशा शब्दात भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पक्षाचे आभार मानले आहेत.

फलटण तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निंबाळकर म्हणाले की, माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती. पण मला मंत्रिपद मिळालं नाही. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे. मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. सिंचनाचे अनेक प्रश्न मला सोडवायचे आहेत असं खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले.

इतकचं नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजपाचं सरकार येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा नाही तर लवकरच सत्यात उतरेल आणि भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात विराजमान होईल असा दावा भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. तोपर्यंत विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वजनानेच कोसळणार आहे. ते आज कोसळेल की उद्या कोसळेल हे मी सांगितलेले नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी आम्ही राज्याला पर्यायी सरकार देऊ असा पुनरुच्चार गुरुवारीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यांचा एकमेकांवरही विश्वास नाही

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा एकमेकांवरही विश्वास नाही आणि आपल्या आमदारांवर देखील विश्वास नाही, असा टोला लगावत नाना पटोले बोलतात, त्यानंतर शरद पवार मत व्यक्त करतात. त्यानंतर काही लोक नाना पटोले यांना न घेताच पवाराची भेट घेतात. यातून सर्व काही कळते, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली होती.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस