शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

“ज्याची अनेक दिवस होती चर्चा, ‘ती’ गोष्ट आता सत्यात उतरणार; भाजपा खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 20:21 IST

माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती असं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

ठळक मुद्देमतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे.माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही

सातारा – भारतीय जनता पार्टीमुळे मी पहिल्यांदा खासदार झालो, अल्पावधीतच माझ्या नावाची चर्चा केंद्रीय मंत्रिपदासाठी झाली. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही, कार्यकर्त्यांनीही नाराज होऊ नका अशा शब्दात भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पक्षाचे आभार मानले आहेत.

फलटण तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निंबाळकर म्हणाले की, माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती. पण मला मंत्रिपद मिळालं नाही. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे. मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. सिंचनाचे अनेक प्रश्न मला सोडवायचे आहेत असं खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले.

इतकचं नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजपाचं सरकार येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा नाही तर लवकरच सत्यात उतरेल आणि भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात विराजमान होईल असा दावा भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. तोपर्यंत विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वजनानेच कोसळणार आहे. ते आज कोसळेल की उद्या कोसळेल हे मी सांगितलेले नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी आम्ही राज्याला पर्यायी सरकार देऊ असा पुनरुच्चार गुरुवारीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यांचा एकमेकांवरही विश्वास नाही

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा एकमेकांवरही विश्वास नाही आणि आपल्या आमदारांवर देखील विश्वास नाही, असा टोला लगावत नाना पटोले बोलतात, त्यानंतर शरद पवार मत व्यक्त करतात. त्यानंतर काही लोक नाना पटोले यांना न घेताच पवाराची भेट घेतात. यातून सर्व काही कळते, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली होती.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस