शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

“ज्याची अनेक दिवस होती चर्चा, ‘ती’ गोष्ट आता सत्यात उतरणार; भाजपा खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 20:21 IST

माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती असं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

ठळक मुद्देमतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे.माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही

सातारा – भारतीय जनता पार्टीमुळे मी पहिल्यांदा खासदार झालो, अल्पावधीतच माझ्या नावाची चर्चा केंद्रीय मंत्रिपदासाठी झाली. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नाराज नाही, कार्यकर्त्यांनीही नाराज होऊ नका अशा शब्दात भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पक्षाचे आभार मानले आहेत.

फलटण तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निंबाळकर म्हणाले की, माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी केली होती. पण मला मंत्रिपद मिळालं नाही. मतदारसंघात केलेल्या कामामुळे माझं नाव मंत्रिपदापर्यंत गेले. मला त्याचा अभिमान आहे. मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडणवण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार आपल्या पाठिशी ठामपणे आहे. सिंचनाचे अनेक प्रश्न मला सोडवायचे आहेत असं खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले.

इतकचं नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भाजपाचं सरकार येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा नाही तर लवकरच सत्यात उतरेल आणि भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात विराजमान होईल असा दावा भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. तोपर्यंत विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आपल्या वजनानेच कोसळणार आहे. ते आज कोसळेल की उद्या कोसळेल हे मी सांगितलेले नाही. पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी आम्ही राज्याला पर्यायी सरकार देऊ असा पुनरुच्चार गुरुवारीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यांचा एकमेकांवरही विश्वास नाही

महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडले नव्हते. यांचा एकमेकांवरही विश्वास नाही आणि आपल्या आमदारांवर देखील विश्वास नाही, असा टोला लगावत नाना पटोले बोलतात, त्यानंतर शरद पवार मत व्यक्त करतात. त्यानंतर काही लोक नाना पटोले यांना न घेताच पवाराची भेट घेतात. यातून सर्व काही कळते, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली होती.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस