शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानावरच घालायचा आहे भाजपला घाला- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 05:43 IST

अशोक चव्हाण यांचे भाजपचा दहशतवाद संपवण्याचे आवाहन

मीरा रोड : मोदी सरकारने देशाच्या न्यायपालिकेवर, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर, रिझर्व्ह बँकेवर हल्ला केला आहे. आता त्यांचे संविधानावर हल्ला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे सरकार देशाच्या हिताचे नाही. देशाच्या हितासाठी हे सरकार घालवणे आवश्यक आहे. देशासाठी जे बलिदान द्यावे लागेल, ते देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. लोकसभा निवडणुकीत आपण सर्व विरोधी पक्षांनी जशी एकजूट दाखवली, तशीच ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवून देशापाठोपाठ राज्यातील भाजपा युतीची सत्ता संपवून टाकू, असा निर्धारही पवार यांनी केला.ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे सावरकर चौकाजवळ मेडतिया मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी पवार येथे आले होते. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, अमर राजुरकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, आरपीआय आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटाबंदी केली. काळा पैसा सामान्यांकडे नसतो तर मोठ्यांकडे असतो. पैसा काढला तो सामान्यांचा. मोदींना स्वीस बँकेतून अजून पैसा आणता आला नाही, असे पवार म्हणाले. जीएसटी आणून देशातील लहान व्यापाºयांना मोदींनी संकटात टाकले. ज्यांनी पाच वर्षांपूर्वी मोदींना पाठिंबा दिला, तेच दु:खी आहेत. तीच अवस्था उद्योग क्षेत्राची आहे. काँग्रेस शासनाने उद्योग वाढवण्याचे काम केल्याने राज्य पहिल्या क्रमांकावर असायचे. पण, आज स्थिती वाईट आहे. सरकारच्या धोरणांमध्ये दोष आहे. आज मुंबई-ठाण्यातील उद्योग संपले. शेतीसोबत उद्योग वाढवले नाहीत. त्याचा सर्वात मोठा फटका तरुणांच्या रोजगाराला बसला, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील भाजपचा दहशतवाद रोखण्याकरिता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोकांनी काय खायचे, काय बोलायचे हे सरकारच ठरवत आहे. याच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो. भाजपच्या दहशतवादापासून देश मुक्त करणे गरजेचे आहे.‘शेतकºयांंसाठी ठोस धोरण नाही’पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा