शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानावरच घालायचा आहे भाजपला घाला- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 05:43 IST

अशोक चव्हाण यांचे भाजपचा दहशतवाद संपवण्याचे आवाहन

मीरा रोड : मोदी सरकारने देशाच्या न्यायपालिकेवर, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर, रिझर्व्ह बँकेवर हल्ला केला आहे. आता त्यांचे संविधानावर हल्ला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे सरकार देशाच्या हिताचे नाही. देशाच्या हितासाठी हे सरकार घालवणे आवश्यक आहे. देशासाठी जे बलिदान द्यावे लागेल, ते देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. लोकसभा निवडणुकीत आपण सर्व विरोधी पक्षांनी जशी एकजूट दाखवली, तशीच ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवून देशापाठोपाठ राज्यातील भाजपा युतीची सत्ता संपवून टाकू, असा निर्धारही पवार यांनी केला.ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे सावरकर चौकाजवळ मेडतिया मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी पवार येथे आले होते. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, अमर राजुरकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, आरपीआय आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटाबंदी केली. काळा पैसा सामान्यांकडे नसतो तर मोठ्यांकडे असतो. पैसा काढला तो सामान्यांचा. मोदींना स्वीस बँकेतून अजून पैसा आणता आला नाही, असे पवार म्हणाले. जीएसटी आणून देशातील लहान व्यापाºयांना मोदींनी संकटात टाकले. ज्यांनी पाच वर्षांपूर्वी मोदींना पाठिंबा दिला, तेच दु:खी आहेत. तीच अवस्था उद्योग क्षेत्राची आहे. काँग्रेस शासनाने उद्योग वाढवण्याचे काम केल्याने राज्य पहिल्या क्रमांकावर असायचे. पण, आज स्थिती वाईट आहे. सरकारच्या धोरणांमध्ये दोष आहे. आज मुंबई-ठाण्यातील उद्योग संपले. शेतीसोबत उद्योग वाढवले नाहीत. त्याचा सर्वात मोठा फटका तरुणांच्या रोजगाराला बसला, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील भाजपचा दहशतवाद रोखण्याकरिता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोकांनी काय खायचे, काय बोलायचे हे सरकारच ठरवत आहे. याच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो. भाजपच्या दहशतवादापासून देश मुक्त करणे गरजेचे आहे.‘शेतकºयांंसाठी ठोस धोरण नाही’पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा