शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:40 IST

भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

ठळक मुद्देदेशातील वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाचकाँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजेपंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

भोपाळ: इंधनदरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे झालेल्या महागाईविरोधातकाँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसची महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसह अन्य राज्यांमध्ये इंधनदरवाढ, महागाईविरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने एक अजब दावा केला असून, देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या भाषणामुळे महागाई वाढल्याचे म्हटले आहे. (bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज!

काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आले असता मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी महागाईचे खापर जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या भाषणावर फोडले असून, अजब दावा केल्याचे सांगितले जात आहे. महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली, असा दावा सारंग यांनी यावेळी बोलताना केला. ते भोपाळमध्ये मीडियाशी बोलत होते.

“लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाच

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली, असा मोठा आरोप सारंग यांनी यावेळी केला. 

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली. भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे असा दावा करत वास्तविक पाहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजे, असा खोचक टोला सारंग यांनी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणInflationमहागाईMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस