शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:40 IST

भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

ठळक मुद्देदेशातील वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाचकाँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजेपंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

भोपाळ: इंधनदरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे झालेल्या महागाईविरोधातकाँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसची महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसह अन्य राज्यांमध्ये इंधनदरवाढ, महागाईविरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने एक अजब दावा केला असून, देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या भाषणामुळे महागाई वाढल्याचे म्हटले आहे. (bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज!

काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आले असता मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी महागाईचे खापर जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या भाषणावर फोडले असून, अजब दावा केल्याचे सांगितले जात आहे. महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली, असा दावा सारंग यांनी यावेळी बोलताना केला. ते भोपाळमध्ये मीडियाशी बोलत होते.

“लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाच

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली, असा मोठा आरोप सारंग यांनी यावेळी केला. 

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली. भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे असा दावा करत वास्तविक पाहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजे, असा खोचक टोला सारंग यांनी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणInflationमहागाईMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस