शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:40 IST

भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

ठळक मुद्देदेशातील वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाचकाँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजेपंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

भोपाळ: इंधनदरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे झालेल्या महागाईविरोधातकाँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसची महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसह अन्य राज्यांमध्ये इंधनदरवाढ, महागाईविरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने एक अजब दावा केला असून, देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या भाषणामुळे महागाई वाढल्याचे म्हटले आहे. (bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज!

काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आले असता मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी महागाईचे खापर जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या भाषणावर फोडले असून, अजब दावा केल्याचे सांगितले जात आहे. महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली, असा दावा सारंग यांनी यावेळी बोलताना केला. ते भोपाळमध्ये मीडियाशी बोलत होते.

“लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाच

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली, असा मोठा आरोप सारंग यांनी यावेळी केला. 

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली. भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे असा दावा करत वास्तविक पाहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजे, असा खोचक टोला सारंग यांनी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणInflationमहागाईMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस