शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

"कोविड संपल्यावर भाजपाची सत्ता; अब्दुल सत्तार शिवसेनेतच राहतील याची गॅरेंटी कुठे आहे?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 08:33 IST

केंद्र सरकार सक्षमपणे पाठिशी उभे राहत असेल. पण राज्य सरकार काय करतंय? धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घ्यावेत असंही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

ठळक मुद्देलोकांच्या डोळ्यातील कुसळ आणि आपलं मुसळही दिसत नाही. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही.कोविड संपल्यावर राज्यात भाजपाची सत्ता येईल - रावसाहेब दानवे

औरंगाबाद – अब्दुल सत्तारांची आणि आमची दोस्ती खूप चांगली आहे. एकमेकांना मदत करतो. यापुढेही मदत करतील. अब्दुल सत्तार शिवसेनेत राहतील याची गॅरेंटी कुठे आहे? पहिले अपक्ष, मग काँग्रेस आणि आता शिवसेनेत.. केंद्राने राज्याला पैसे दिलेत आता राज्याने ते लोकांपर्यंत पोहोचवावेत. घाबरु नका, कोविड संपल्यावर आपलीच सत्ता येईल. कोविड संपलं की सत्तार मला भेटायला भोकरदनला येतील आणि बोलतील फडणवीसांना भेटायला जाऊया असा चिमटा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना काढला.

औरंगाबादेतील एका ग्रामपंचायत इमारतीच्या उद्धाटन कार्यक्रमात अब्दुल सत्तार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एकत्र आले होते. त्यावेळी दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तारांची सासरवाडी भोकरदन तर माझी सासरवाडी सिल्लोड आहे. आमची बहिण नगरपालिकेची अध्यक्ष होती तिला झेंडावंदनलाही बोलावलं नाही. लोकांच्या डोळ्यातील कुसळ आणि आपलं मुसळही दिसत नाही. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही. अब्दुल सत्तारसारखा नेता महाराष्ट्रात नाही, सगळ्यांना मदत करतो आणि  निवडून आल्यावर नावं ठेवतो. यावेळेला मी तुम्हाला मदत केली नाही कारण मला याआधीच माहिती होतं शिवसेना काय करणार आहे असंही ते म्हणाले.

तसेच परिस्थिती कठीण आहे, एकमेकांसमोर तोंड बांधून उभं राहू असं कधी वाटलं नाही, पण काही लोकांच्यावर याचाही परिणाम होत नाही. ही जागतिक महामारी आहे. केवळ आपल्या देशात नाही तर जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली. लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला. वेळीच पंतप्रधानांनी हे संकट ओळखून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे त्यांचं जगातील अनेक देश कौतुक करतात. कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सक्षम आहे पण हतबल नाही. २० लाख कोटींचे केंद्र सरकारनं पॅकेज दिले. ८० कोटी लोकांना २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलोने तांदूळ दिले. कोविड काळात मोफत ५ किलो तांदूळ देण्याची योजना केंद्राने आणली. केंद्र सरकार सक्षमपणे पाठिशी उभे राहत असेल. पण राज्य सरकार काय करतंय? धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घ्यावेत असंही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

राजकारणात जनता हीच गुरू

माझ्या घरात, नात्यात कोणीही राजकारणात नव्हते. मला मतदारांनीच घडवले. गावाचा सरपंच केले तेव्हा गावाने घडवले. तालुक्याचा सभापती झालो, तेव्हा तालुक्यातील जनतेने मदत केली. पुढे जाफराबाद-भोकरदन तालुक्याचा आमदार झालो तेव्हाही त्या लोकांनी प्रेम केले. त्यानंतर पाच टर्म झाले जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. एकूण ३५ वर्षे आमदार-खासदार आहे. यात माझे फार काम आहे हे म्हणण्यापेक्षा लोकांनीच माझे नेतृत्व विकसित केले आहे. गत ३५ वर्षांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे लोकांचे अमाप प्रेम मिळाले. लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि सांगतील ती कामे केल्यामुळे प्रेम करतात असं रावसाहेब दानवे म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसraosaheb danveरावसाहेब दानवेAbdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपा