शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

“एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण करतोच”; भाजपा नेत्याचा शिवसेना अन् राष्ट्रवादीला इशारा

By प्रविण मरगळे | Updated: February 10, 2021 11:58 IST

BJP Ganesh Naik Target Shiv Sena & NCP: अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला.

ठळक मुद्देआतापर्यंत १४ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आम्हाला काही फरक पडत नाहीआमचे जितके नगरसेवक फोडाल त्यापेक्षा दुपटीने तुमचे फोडूनवी मुंबईत महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे.

नवी मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला वेग आला आहे. आतापर्यंत भाजपाच्या १४ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. या राजकीय घडामोडीमुळे भाजपा नेते गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे भाजपा विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी हे राजकारण चांगलंच रंगल्याचं दिसून येत आहे.

याबाबत गणेश नाईक म्हणाले की, आतापर्यंत १४ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आम्हाला काही फरक पडत नाही, आमचे जितके नगरसेवक फोडाल त्यापेक्षा दुपटीने तुमचे फोडू, एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण करतोच असं सांगत नाईकांनी शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.(Navi Mumbai Municipal Corporation Election Update News) 

शिवसेना नेत्यांचा एकला चलो रे नारा

नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यातच जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, यात महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा असल्याचं पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईत महापालिकेत पक्षीय बलाबल (एकूण १११)

भाजपा – ५६

शिवसेना – ३८

राष्ट्रवादी – २

काँग्रेस – १०

इतर – ५

नवी मुंबईत महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे. नाईक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता, त्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता कोसळली, अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक गणेश नाईकांची साथ सोडून पुन्हा स्वगृही परतत असल्याचं दिसून येत आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यासोबत मनसेनेही यंदा नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षापासून मनसेने नवी मुंबईत पक्षीय बांधणी केली आहे, यंदा पहिल्यांदाच ही महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरेंनी घेतल्या होत्या, मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला ५० हजारांपेक्षा जास्त मतदान शहरातील  २ मतदारसंघात झालं होतं, त्याचसोबत इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanesh Naikगणेश नाईक