शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Farmer Protest: भाजपाने राज्यसभा खासदारांना बजावला व्हीप; सोमवारचा दिवस मोदींसाठी महत्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 19:35 IST

Farmer Protest affected Budget Session: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनावरून आता संसदेत गदारोळ सुरु आहे. कृषी विधेयकांवर लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा न करताच विधेयके संमत करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना दिल्ला वेढा घातलेला असतानाआता विरोधकही केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे 8 फेब्रुवारी, सोमवारी भाजपाने सर्व खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. (BJP issue Whip to Rajyasabha MP for Monday)

राज्यसभेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा संपली. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा होऊ शकली नाही. प्रश्नोत्तर काळात आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. कामकाज वारंवार तहकूब होत होते. सायंकाळी 4 आणि पुन्हा 6 वाजता कामकाज सुरु करण्यात आले. शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. यामध्ये सोमवारी कोणत्याही परिस्थितीत खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान  नरेंद्र मोदी राज्यसभेत सोमवारी शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांवर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. 

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेस