शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: भाजपाने राज्यसभा खासदारांना बजावला व्हीप; सोमवारचा दिवस मोदींसाठी महत्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 19:35 IST

Farmer Protest affected Budget Session: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनावरून आता संसदेत गदारोळ सुरु आहे. कृषी विधेयकांवर लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा न करताच विधेयके संमत करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना दिल्ला वेढा घातलेला असतानाआता विरोधकही केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे 8 फेब्रुवारी, सोमवारी भाजपाने सर्व खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. (BJP issue Whip to Rajyasabha MP for Monday)

राज्यसभेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा संपली. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा होऊ शकली नाही. प्रश्नोत्तर काळात आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. कामकाज वारंवार तहकूब होत होते. सायंकाळी 4 आणि पुन्हा 6 वाजता कामकाज सुरु करण्यात आले. शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. यामध्ये सोमवारी कोणत्याही परिस्थितीत खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान  नरेंद्र मोदी राज्यसभेत सोमवारी शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांवर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. 

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेस