शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

VIDEO: 'भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही; पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो'

By कुणाल गवाणकर | Updated: December 26, 2020 09:49 IST

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा

जयपूर: भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप मुस्लिमांना निवडणुकीत उमेदवारी देत नाही. मात्र सरकारं पाडण्यासाठी त्यांचा वापर करते, अशा शब्दांत गेहलोत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. भाजपचे नेते जफर इस्लाम गेहलोत यांच्या निशाण्यावर होते. इस्लाम यांनी राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची मुस्लिमांबद्दलची भूमिका दुटप्पी असल्याची टीका गेहलोत यांनी केली. 'भाजपनं राज्यातलं काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. या कटात भाजप नेते जफर इस्लाम यांचा समावेश होता. भाजप निवडणुकीत मुस्लिमांना तिकीट देत नाही. पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो,' असा आरोप गेहलोत यांनी केला.उत्तर प्रदेशात ४०० अधिक विधानसभा मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये २५० च्या आसपास मतदारसंघ आहेत. मात्र भाजप एकाही मुस्लिम व्यक्तीला तिकीट देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल अलिगढ मुस्लिम विद्यापीठात किती छान भाषण दिलं. पंतप्रधानांचं व्यक्तीमत्त्व किती उदारमतवादी आहे, ते किती मोठ्या मनाचे आहेत. पण बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत किती फरक आहे. निवडणुकीत भाजप मुस्लिम व्यक्तींना उमेदवारी देत नाही. पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर नक्की करतो, अशा शब्दांत गेहलोत यांनी भाजपवर शरसंधान साधलं.मोदी सरकारनं आणलेले नवे कृषी कायदे आणि त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन यावरूनही गेहलोत यांनी टीकास्त्र सोडलं. 'शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. सध्या हिवाळा सुरू आहे. आपल्याला इथे जयपूरमध्ये घरातही थंडी जाणवते आणि तिथे हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही. कोणत्याही व्यक्तीनं इतकं असंवेदनशील असू नये,' असं गेहलोत म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी