शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

“अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

By प्रविण मरगळे | Updated: February 21, 2021 10:55 IST

BJP Target CM Uddhav Thackeray: कोरोनाशी लढा संपलेला नाही, त्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे केली होती,

ठळक मुद्देपारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचेपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची मागणी १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय?, भाजपाची टीका

मुंबई – राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनानं(Coronavirus in Maharashtra) पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) लोकांची होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याची भूमिका मांडली आहे, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Target CM Uddhav Thackeray)

अतुल भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री.. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी...मग दुसऱ्यांना सल्ला द्या अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

कोरोनाचा लढा संपलेला नाही. अशा वेळी कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.

कोरोना काळात भाजपाकडून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली जात होती, मुख्यमंत्री फिल्डवर न फिरता फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते, सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहण्यासाठी मुख्यमंत्री कधीही फिरकले नाही, केवळ मातोश्रीत बसून मुख्यमंत्री सरकार चालवतायेत असा आरोप विरोधकांकडे केला जात होता, त्यातच कार्यालयीन वेळा बदलण्याच्या मागणीवरून भाजपाने ही टीका केली आहे.  

पाच दिवसांत पश्चिम अन् मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासीसंख्येत २ लाखांची घट

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे, यानंतर कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याचं काहींचे म्हणणं आहे, त्यामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत मागील पाच दिवसांत एकूण २ लाखांनी घट झाली आहे.

लोकल सुरू झाल्याने नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या १७,५९,१२३ इतकी होती. तर १९ तारखेला ती १६,८८,२६० पर्यंत खाली आली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारीच्या तुलनेत १९ फेब्रुवारीच्या प्रवासीसंख्येत एक ते दीड लाखांची घट झाली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारी रोजी २३,३९,१३१ अशी प्रवासीसंख्या होती, तर १९ फेब्रुवारीला ही प्रवासीसंख्या २० लाखांपर्यंत आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपा