शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

“अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

By प्रविण मरगळे | Updated: February 21, 2021 10:55 IST

BJP Target CM Uddhav Thackeray: कोरोनाशी लढा संपलेला नाही, त्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे केली होती,

ठळक मुद्देपारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचेपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची मागणी १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय?, भाजपाची टीका

मुंबई – राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनानं(Coronavirus in Maharashtra) पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) लोकांची होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याची भूमिका मांडली आहे, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Target CM Uddhav Thackeray)

अतुल भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, १० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री.. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी...मग दुसऱ्यांना सल्ला द्या अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

कोरोनाचा लढा संपलेला नाही. अशा वेळी कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.

कोरोना काळात भाजपाकडून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली जात होती, मुख्यमंत्री फिल्डवर न फिरता फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते, सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहण्यासाठी मुख्यमंत्री कधीही फिरकले नाही, केवळ मातोश्रीत बसून मुख्यमंत्री सरकार चालवतायेत असा आरोप विरोधकांकडे केला जात होता, त्यातच कार्यालयीन वेळा बदलण्याच्या मागणीवरून भाजपाने ही टीका केली आहे.  

पाच दिवसांत पश्चिम अन् मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासीसंख्येत २ लाखांची घट

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे, यानंतर कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याचं काहींचे म्हणणं आहे, त्यामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत मागील पाच दिवसांत एकूण २ लाखांनी घट झाली आहे.

लोकल सुरू झाल्याने नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या १७,५९,१२३ इतकी होती. तर १९ तारखेला ती १६,८८,२६० पर्यंत खाली आली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारीच्या तुलनेत १९ फेब्रुवारीच्या प्रवासीसंख्येत एक ते दीड लाखांची घट झाली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारी रोजी २३,३९,१३१ अशी प्रवासीसंख्या होती, तर १९ फेब्रुवारीला ही प्रवासीसंख्या २० लाखांपर्यंत आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपा