शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

"सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 11:01 IST

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन केंद्र सरकावर जोरदार टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपाने आता प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना यावरून सणसणीत टोला लगावला आहे. "सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध" असं म्हणत निशाणा साधला आहे. राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत आपण मुंबईची चिंता करा असं देखील म्हटलं आहे. तसेच "जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते. या समस्यांवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना सुरक्षा पुरवली जातेय ही अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो. हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे" अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

"तरी आपणास असं खरंच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, गेली दीड वर्ष मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात… ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही" असा टोला चित्रा वाघ यांना लगावला आहे. तसेच "आपले राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व बिहार निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचंय संजयजी की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत."

"आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. कारण लोकल बंद झाल्यामुळे लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते... या समस्यांवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे" असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. याआधीही अनेकदा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी "महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय" असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMumbaiमुंबई