शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

"सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध"; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 11:01 IST

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन केंद्र सरकावर जोरदार टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपाने आता प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना यावरून सणसणीत टोला लगावला आहे. "सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध" असं म्हणत निशाणा साधला आहे. राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत आपण मुंबईची चिंता करा असं देखील म्हटलं आहे. तसेच "जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते. या समस्यांवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना सुरक्षा पुरवली जातेय ही अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो. हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे" अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

"तरी आपणास असं खरंच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, गेली दीड वर्ष मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात… ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही" असा टोला चित्रा वाघ यांना लगावला आहे. तसेच "आपले राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व बिहार निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचंय संजयजी की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत."

"आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. कारण लोकल बंद झाल्यामुळे लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते... या समस्यांवर आपण आपल्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे" असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. याआधीही अनेकदा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी "महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय" असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMumbaiमुंबई