शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; "शरद पवार घराबाहेर पडतात, पण..."

By प्रविण मरगळे | Updated: October 29, 2020 12:54 IST

BJP Chandrakant patil on CM Uddhav Thackeray News: राज ठाकरे खूपच स्पष्ट शब्दात बोलतात असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देमी इथं खुर्चीत बसतो, तुम्ही राज्य सांभाळण्याचं कंत्राट घ्या असं उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हणाले असतीलमंदिरे बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, देवस्थानाकडून सुरु असणारे सामाजिक कामे थांबलीशरद पवार राज्य चालवतायेत, उद्धव ठाकरे ना कधी प्रवास करत, ना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रश्न सोडवतात

सांगली – पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार राज्य चालवतायेत, उद्धव ठाकरे ना कधी प्रवास करत, ना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रश्न सोडवतात, मंदिरे बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, देवस्थानाकडून सुरु असणारे सामाजिक कामे थांबली, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस लोकांना बाहेर दिसतात, म्हणून कदाचित राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला असावा असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला.

तसेच ही वस्तूस्थिती आहे की, मी इथं खुर्चीत बसतो, तुम्ही राज्य सांभाळण्याचं कंत्राट घ्या असं उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हणाले असतील, तसा त्यांच्यात करार झाला असावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचसोबत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेवर पाटील यांनी उत्तर दिलं, राज ठाकरे खूपच स्पष्ट शब्दात बोलतात असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेहोते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी राज ठाकरेंनी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात वाढीव वीजबिल आणि दूधदराबाबत सरकारने निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे. वीजबिलाचा विषय मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करतायेत. वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचे म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारने तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, वीजबिल भरमसाठ येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, रेल्वे सुरु होत नाही, ११ वीचे प्रवेश रखडले, रस्त्यावर सगळीकडे वाहतूक कोंडी दिसतेय, लोकल सुरु नाही, हॉटेल सुरु झाले मंदिरे सुरु झाली नाही, सरकारने या सर्व गोष्टींचा एकदा खुलासा करणं गरजेचे आहे. प्रश्नांची कमतरता नाही पण निर्णयाची कमतरता आहे, कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, कधी काय सुरु होणार हे सरकारने एकदा सांगावे अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे. दरम्यान राज ठाकरेंना यावेळी राज्यपालांनी शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला दिला त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे