शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
13
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
14
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
15
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
16
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
17
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
18
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
19
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
20
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत

बिहार निकालावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; “पक्षासाठी पराभव होणं ही सर्वसामान्य घटना”

By प्रविण मरगळे | Updated: November 16, 2020 13:37 IST

Bihar Election Result, Congress Kapil Sibal News: बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात विचार विनिमय होणं गरजेचे आहे, तर दुसरीकडे महाआघाडीच्या पराभवात आरजेडी आणि डावे पक्ष काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधत आहेत.

ठळक मुद्देजर गेल्या ६ वर्षात काँग्रेसने विचारमंथन केले नाही तर आता ती अपेक्षा कशी करू शकतो? जर काँग्रेसने आता विचार केला नाही तर पक्षाची घसरण अशीच सुरु राहिल.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली – बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. बिहार निवडणुकीत ७० जागा लढवून काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर समाधान मानावं लागलं. आरजेडी आणि काँग्रेस महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी खराब राहिल्याने महाआघाडीला बहुमतापासून दूर राहावं लागलं. काँग्रेसच्या या पराभवामुळे पक्षाच्या नेतृत्वावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

याबाबत कपिल सिब्बल म्हणाले की, काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटनेसारखा झाला आहे. बिहार निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अद्याप कोणताही विचार झालेला नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल की, सगळं काही ठीक आहे आणि ही सामान्य घटना आहे असं सिब्बल यांनी सांगितले.

इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कपिल सिब्बल यांनी हे उत्तर दिलं. तसेच मी फक्त माझं वैयक्तिक मत मांडत आहे. मी नेतृत्वाला याबद्दल काही बोलताना ऐकलं नाही. माझ्याकडे नेतृत्वाबद्दल लोकांचा आवाज पोहचतो, मला फक्त तेवढचं माहिती असते. सिब्बल यांच्यापूर्वी बिहार काँग्रेसमधील मोठे नेते तारिक अन्वर यांनीही पक्षातंर्गत नेतृत्वाबद्दल भाष्य केलं होतं. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात विचार विनिमय होणं गरजेचे आहे, तर दुसरीकडे महाआघाडीच्या पराभवात आरजेडी आणि डावे पक्ष काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधत आहेत.

विचारमंथन करणार कसं?

बिहारमधील आमचे सहकारी तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये निकालाबद्दल विचारमंथन होणं गरजेचे आहे असं म्हटलं. जर गेल्या ६ वर्षात काँग्रेसने विचारमंथन केले नाही तर आता ती अपेक्षा कशी करू शकतो? आम्हाला काँग्रेसची कमतरता माहिती आहे. आम्हाला पक्षातंर्गत काय समस्या आहेत ते माहिती आहे. याचं समाधान काय असेल याचीही सगळ्या नेत्यांना जाणीव आहे. काँग्रेस पक्षालाही माहिती आहे. पण समस्येचा समाधान सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, जर काँग्रेसने आता विचार केला नाही तर पक्षाची घसरण अशीच सुरु राहिल. काँग्रेसच्या या स्थितीमुळे आम्ही सगळे चिंतेत आहोत असंही कपिल सिब्बल म्हणाले. त्याचसोबत काँग्रेस कार्यकारणीत समितीत संविधानानुसार लोकशाही पद्धत अवलंबली पाहिजे असंही त्यांनी सांगितले.

पक्षाच्या सुधारणेसंदर्भातील उपायांबद्दल कॉंग्रेस नेते सिब्बल म्हणाले, सर्वप्रथम आपल्याला संवादाची प्रक्रिया सुरू करावी लागेल. आम्हाला युतीची गरज आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचीही गरज आहे. जनता आमच्याकडे येईल याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. आमच्याकडे आता पूर्वीसारखी ताकद नाही. ज्यांना राजकीय अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. परंतु या सुधारणेसाठी पहिल्यांदा विचारमंथन आवश्यक आहे.

सक्षम नेतृत्वाची गरज

आम्हाला अनेक स्तरांवर अनेक गोष्टी कराव्या लागतील. पक्षाच्या पातळीवर, पक्षाची भूमिका माध्यमात ठेवण्यापर्यंत, ज्या नेत्यांना ऐकायला लोकांना आवडतं त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर सक्षम नेतृत्वाचीही गरज आहे, जे त्यांच्या गोष्टी मोठ्या हुशारीने लोकांसमोर ठेवतील असं कपिल सिब्बल म्हणाले.

कॉंग्रेस कमकुवत झालीय हे मान्य करावं लागेल.

बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच गुजरात आणि मध्य प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या निराशाजनक कामगिरीबद्दल सिब्बल म्हणाले, "ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाला पर्याय आहे, तेथेही लोकांना काँग्रेसबद्दल जितका हवा तितका विश्वास नाही. काँग्रेस कमकुवत झाली आहे हे पक्षाला मान्य करावं लागेल असंही सिब्बल म्हणाले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी