शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Bihar Election Result: बिहारमध्येही ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होऊ शकतं; शिवसेना मंत्र्याचा मोठा दावा

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 17:05 IST

Bihar Election Result, Shiv Sena News: बिहार भाजपा प्रदेशाध्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं जाहीर केले आहे.

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, मात्र यात जेडीयूपेक्षा भाजपाला सर्वाधित ७५ पेक्षा जास्त जागा मिळाल्याने मुख्यमंत्रिपदावरून संभ्रमाचा वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे केला होता, पण निकालानंतर चित्र बदललं आहे. भाजपाला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपा शब्द पाळणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बिहार भाजपा प्रदेशाध्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं जाहीर केले आहे. दरम्यान बिहार निवडणुकीत मिळालेल्या जोरदार यशामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसला जोर मिळणार अशी चर्चा सुरु होती, यावर बिहारच्या निवडणुकीच्या निकालांवर काही बोलणार नाही, ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन धनुष्यबाणही होऊ शकतं, कोणी कोणाला रोखू शकत नाही, त्यामुळे कोणी ऑपरेशन करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असा दावा शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केला आहे.

महाराष्ट्रासारखी बिहारात परिस्थिती निर्माण होऊ शकते असं राजकीय विश्लेषक निवडणुकीपूर्वी सांगत होते, परंतु निकालात जेडीयूला मिळालेल्या जागांमुळे चित्र बदललं आहे. जेडीयूला जास्त जागा मिळाल्या असत्या तर नितीश कुमार काँग्रेस-आरजेडीसोबत जाऊ शकतात असं म्हटलं जात होतं, मात्र मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असणाऱ्या जेडीयूला बिहार निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागत आहे. बिहारमध्ये भाजपा ७७ त्यानंतर राजद ६९ जागांवर आघाडी असल्याचं दिसून येत आहे.

बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान

शिवसेना उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान

या निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते, पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढवता येणार नाही असा आदेश दिला, त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले, पण नापसंत पडल्याने शिवसेनेने दुसरं चिन्ह देण्याची मागणी केली, शिवसेनेची विनंती मान्य करत निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारं चिन्ह शिवसेनेला दिलं होतं. दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मतदान झाल्याचं दिसून आलं.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमार