शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

Bihar Election Result 2020: नितीश कुमारांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार?; भाजपा नेत्याचं मोठं विधान

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 13:20 IST

Bihar Election Result, BJP, NItish Kumar News: बिहार निवडणुकीत जेडीयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, पहिल्यांदाच इतक्या वर्षापासून आघाडीत जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देनितीशकुमार यांच्या टीमने निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीबद्दल कोविड आणि चिराग पासवान यांना जबाबदार धरलेचिराग यांनी बिहारमधील संपूर्ण प्रचारादरम्यान नितीशकुमार यांना लक्ष्य केलं होतंनितीश कुमारांच्या जेडीयूला फटका देण्यासाठी भाजपानेही रणनीती खेळली आहे असा संशय

नवी दिल्ली -  बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, भाजपा आणि जेडीयू आघाडीला बिहारमध्ये बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र या आघाडीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने जेडीयूही चिंतेत आहे. बिहारमध्ये भाजपाला ७० हून जास्त जागा मिळतील असं निकालांच्या कलमध्ये दिसत आहे. मात्र नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भाजपाच्या भरवशावर आहे. कारण बिहारमध्ये जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या आहेत.

बिहार निवडणुकीत जेडीयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, पहिल्यांदाच इतक्या वर्षापासून आघाडीत जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे आघाडीत भाजपा मोठा भाऊ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या १५ वर्षापासून नितीश कुमार बिहारमध्ये सत्तेत आहेत, त्यामुळे सरकारविरोधी फटका जेडीयूला बसला असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. मात्र निवडणुकीच्या निकालामुळे मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांकडे राहणार का? सध्या या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.

भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळ पर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. मात्र त्यांच्या या विधानावरून भाजपा राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेले आश्वासन भाजपा पाळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

दुसरीकडे नितीशकुमार यांच्या टीमने निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीबद्दल कोविड आणि चिराग पासवान यांना जबाबदार धरले. केंद्रातील भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या ३८ वर्षीय चिराग यांनी बिहारमधील संपूर्ण प्रचारादरम्यान नितीशकुमार यांना लक्ष्य केलं होतं, यासंदर्भात जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, चिराग पासवान यांना भाजपाने सुरुवातीपासून त्यांना वेगळे करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. चिराग पासवान यांनी नितीश यांच्या व्होट बँकेला छेद दिला असा दावा जेडीयूचा आहे.

विशेष म्हणजे भाजपाचे समीक्षक आणि नितीशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हेच वाटत आहे की, चिराग पासवान यांना भाजपाने बंडखोरी करण्यास सांगितले आहे किंवा नितीश कुमारांच्या जेडीयूला फटका देण्यासाठी भाजपानेही रणनीती खेळली आहे असा संशय व्यक्त केला जातो. अशा स्थितीत जुन्या मित्रपक्षांच्या भविष्याचा निर्णय भाजपाच्या हाती येईल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री