शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Bihar Election Result 2020: नितीश कुमारांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार?; भाजपा नेत्याचं मोठं विधान

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 13:20 IST

Bihar Election Result, BJP, NItish Kumar News: बिहार निवडणुकीत जेडीयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, पहिल्यांदाच इतक्या वर्षापासून आघाडीत जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देनितीशकुमार यांच्या टीमने निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीबद्दल कोविड आणि चिराग पासवान यांना जबाबदार धरलेचिराग यांनी बिहारमधील संपूर्ण प्रचारादरम्यान नितीशकुमार यांना लक्ष्य केलं होतंनितीश कुमारांच्या जेडीयूला फटका देण्यासाठी भाजपानेही रणनीती खेळली आहे असा संशय

नवी दिल्ली -  बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, भाजपा आणि जेडीयू आघाडीला बिहारमध्ये बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र या आघाडीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने जेडीयूही चिंतेत आहे. बिहारमध्ये भाजपाला ७० हून जास्त जागा मिळतील असं निकालांच्या कलमध्ये दिसत आहे. मात्र नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न भाजपाच्या भरवशावर आहे. कारण बिहारमध्ये जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या आहेत.

बिहार निवडणुकीत जेडीयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, पहिल्यांदाच इतक्या वर्षापासून आघाडीत जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे आघाडीत भाजपा मोठा भाऊ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या १५ वर्षापासून नितीश कुमार बिहारमध्ये सत्तेत आहेत, त्यामुळे सरकारविरोधी फटका जेडीयूला बसला असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. मात्र निवडणुकीच्या निकालामुळे मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांकडे राहणार का? सध्या या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.

भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळ पर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. मात्र त्यांच्या या विधानावरून भाजपा राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेले आश्वासन भाजपा पाळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

दुसरीकडे नितीशकुमार यांच्या टीमने निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीबद्दल कोविड आणि चिराग पासवान यांना जबाबदार धरले. केंद्रातील भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या ३८ वर्षीय चिराग यांनी बिहारमधील संपूर्ण प्रचारादरम्यान नितीशकुमार यांना लक्ष्य केलं होतं, यासंदर्भात जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, चिराग पासवान यांना भाजपाने सुरुवातीपासून त्यांना वेगळे करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. चिराग पासवान यांनी नितीश यांच्या व्होट बँकेला छेद दिला असा दावा जेडीयूचा आहे.

विशेष म्हणजे भाजपाचे समीक्षक आणि नितीशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हेच वाटत आहे की, चिराग पासवान यांना भाजपाने बंडखोरी करण्यास सांगितले आहे किंवा नितीश कुमारांच्या जेडीयूला फटका देण्यासाठी भाजपानेही रणनीती खेळली आहे असा संशय व्यक्त केला जातो. अशा स्थितीत जुन्या मित्रपक्षांच्या भविष्याचा निर्णय भाजपाच्या हाती येईल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री