शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Bihar Election 2020 : "भारत माता की जय' बोलल्याने काहींना ताप येतो', मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 09:09 IST

Bihar Election 2020 And Narendra Modi : सभेला संबोधित करतान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली -  बिहारमध्ये मंगळवारी दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाले. आता निवडणुकीचा केवळ एकच टप्पा शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली. सभेला संबोधित करतान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये जंगलराज आणणाऱ्यांना  'भारत माता की जय' आणि 'जय श्रीराम' म्हणल्यास त्रास होतो. लोकांनी अशा व्यक्तींपासून सतर्क राहिलं पाहिजे आणि त्यांना योग्य उत्तर दिलं पाहिजे असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान मोदींनी बिहारच्या सहरसामध्ये सभा घेतली. "जे फक्त आपल्या घरासाठी जगतात, अशा जंगलराजचा इतिहास असलेल्यांपासून बिहारमधील जनतेनं सावध राहावं. बिहारमधील जनतेने 'भारत माता की जय' घोषणा देऊ नये, अशी जंगलराजवाल्यांची इच्छा आहे. काहींना तर 'भारत माता की जय' बोलल्यामुळे ताप येतो. आता भारत मातेचे विरोधक मत मागण्यासाठी एकजूट झाले आहेत. अशांना योग्य उत्तर द्या" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

मोदींनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत, लोकल फॉर व्होकल आणि सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा देखील उल्लेख केला. "आज विक्रेते सुलभ कर्ज घेत आहेत. तसेच शेतकर्‍यांना पशुसंवर्धन आणि मत्स्य उत्पादकांना क्रेडिट कार्ड सुविधा दिली जात आहे. बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात असं उत्पादन होऊ शकतं ज्यामुळे जगात राज्याचं नाव होऊ शकेल. आता देशातील धान्यांचे पॅकेजिंग जूटच्या पोत्यात होईल. त्याचबरोबर साखरेच्या पॅकेजिंगमध्ये जूटला प्राधान्य मिळेल, याचा फायदा बिहारच्या जूट उत्पादनक शेतकऱ्यांना होईल असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे 100 खासदार नाहीत - मोदी 

अररियामधल्या फारबिसगंजमध्ये भाषण करताना मोदींनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा समाचार घेतला. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. काँग्रेसच्या सध्यस्थितीवरून हेच दिसतंय, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. 'बिहारच्या जनतेनं डबल युवराजांना नाकारत पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राज्यात एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे,' असं मोदी म्हणाले. 'आज संपूर्ण जगाला बिहारनं संदेश दिला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना बिहारी जनता उत्साहानं मतदानासाठी घराबाहेर पडली आहे. दुसऱ्या टप्प्यात सध्या बंपर मतदान सुरू आहे,' असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना संकटात निवडणूक घेणाऱ्या निवडणूक आयोगाचेही मोदींनी आभार मानले.

काँग्रेसवर मोदींचं टीकास्त्र

काँग्रेसनं देशाला खोटी स्वप्नं दाखवली. गरिबी हटवू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, वन रँक वन पेंशन लागू करू, अशी आश्वासनं काँग्रेसनं दिली. मात्र त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळेच आज काँग्रेसची अवस्था वाईट आहे. लोकसभा, राज्यसभेतली सदस्यांची संख्या एकत्र करूनही त्यांचे 100 खासदार होत नाहीत. अनेक राज्यांत तर त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये तर ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळेच कोणाची तरी मदत घेऊन ते अस्तित्व टिकवू पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा