शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020 : "भारत माता की जय' बोलल्याने काहींना ताप येतो', मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 09:09 IST

Bihar Election 2020 And Narendra Modi : सभेला संबोधित करतान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली -  बिहारमध्ये मंगळवारी दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाले. आता निवडणुकीचा केवळ एकच टप्पा शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली. सभेला संबोधित करतान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये जंगलराज आणणाऱ्यांना  'भारत माता की जय' आणि 'जय श्रीराम' म्हणल्यास त्रास होतो. लोकांनी अशा व्यक्तींपासून सतर्क राहिलं पाहिजे आणि त्यांना योग्य उत्तर दिलं पाहिजे असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान मोदींनी बिहारच्या सहरसामध्ये सभा घेतली. "जे फक्त आपल्या घरासाठी जगतात, अशा जंगलराजचा इतिहास असलेल्यांपासून बिहारमधील जनतेनं सावध राहावं. बिहारमधील जनतेने 'भारत माता की जय' घोषणा देऊ नये, अशी जंगलराजवाल्यांची इच्छा आहे. काहींना तर 'भारत माता की जय' बोलल्यामुळे ताप येतो. आता भारत मातेचे विरोधक मत मागण्यासाठी एकजूट झाले आहेत. अशांना योग्य उत्तर द्या" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

मोदींनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत, लोकल फॉर व्होकल आणि सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा देखील उल्लेख केला. "आज विक्रेते सुलभ कर्ज घेत आहेत. तसेच शेतकर्‍यांना पशुसंवर्धन आणि मत्स्य उत्पादकांना क्रेडिट कार्ड सुविधा दिली जात आहे. बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात असं उत्पादन होऊ शकतं ज्यामुळे जगात राज्याचं नाव होऊ शकेल. आता देशातील धान्यांचे पॅकेजिंग जूटच्या पोत्यात होईल. त्याचबरोबर साखरेच्या पॅकेजिंगमध्ये जूटला प्राधान्य मिळेल, याचा फायदा बिहारच्या जूट उत्पादनक शेतकऱ्यांना होईल असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे 100 खासदार नाहीत - मोदी 

अररियामधल्या फारबिसगंजमध्ये भाषण करताना मोदींनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा समाचार घेतला. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. काँग्रेसच्या सध्यस्थितीवरून हेच दिसतंय, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. 'बिहारच्या जनतेनं डबल युवराजांना नाकारत पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राज्यात एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे,' असं मोदी म्हणाले. 'आज संपूर्ण जगाला बिहारनं संदेश दिला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना बिहारी जनता उत्साहानं मतदानासाठी घराबाहेर पडली आहे. दुसऱ्या टप्प्यात सध्या बंपर मतदान सुरू आहे,' असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना संकटात निवडणूक घेणाऱ्या निवडणूक आयोगाचेही मोदींनी आभार मानले.

काँग्रेसवर मोदींचं टीकास्त्र

काँग्रेसनं देशाला खोटी स्वप्नं दाखवली. गरिबी हटवू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, वन रँक वन पेंशन लागू करू, अशी आश्वासनं काँग्रेसनं दिली. मात्र त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळेच आज काँग्रेसची अवस्था वाईट आहे. लोकसभा, राज्यसभेतली सदस्यांची संख्या एकत्र करूनही त्यांचे 100 खासदार होत नाहीत. अनेक राज्यांत तर त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये तर ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळेच कोणाची तरी मदत घेऊन ते अस्तित्व टिकवू पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा