शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 07:10 IST

अनेक लहान पक्ष मैदानात : कोण खाणार कोणाची मते

शीलेश शर्मा नवी दिल्ली: बिहार विधानसभेची यंदाची निवडणूक ही दुरंगी न राहता बहुरंगी बनली आहे. २०१५ च्या आधी लहान पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत होते; पण यंदासारखे त्यांचे तगडे आव्हान कधी पाहण्यास मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहेत.

बिहारच्या राजकारणात पूर्वी काँग्रेसचा दबदबा त्यानंतर लालूप्रसाद यादव, नितीशकुमार यांचेच वर्चस्व राहिले आहे. २०१० च्या निवडणुकीनंतर भाजपनेदेखील आपली पकड घट्ट केली. २०१५ ची निवडणूक राष्ट्रीय जनता दल, जनता दल (यु), काँग्रेस व मित्र पक्षांच्या महागठबंधन विरोधात भाजप, एलजेपी यांच्या एनडीएमध्ये झाली होती. त्यावेळी एमआयएमसह इतर पक्षांनी उमेदवार दिले होते; पण त्यांना जनतेने महत्त्व दिल्याचे दिसले नाही.

यंदाच्या निवडणुकीत मात्र प्रत्येक मतदारसंघानुसार गणित बदललेले आहे. भाजप, जनता दलाची (यु) रालोआ कागदावर वरचढ दिसत असली तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र त्यांच्या उमेदवारांना राजद-काँग्रेस महागठबंधनसह जीडीएसएफ (उपेंद्रसिंह कुशवाह), एलजेपी, पीडीए (पप्पू यादव), एलजेपी (चिराग पासवान) या पक्षांच्या उमेदवारांचे कडवे आव्हान आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) प्रमुख रामविलास पासवान यांचे झालेले निधन व पासी समाजाकडून मिळत असलेले समर्थन, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेला पक्ष प्रवेश, केंद्रात मोदी; पण बिहारमध्ये नितीशऐवजी कोणी, अशा भूमिकेमुळे एलजेपी यावेळी गेमचेंजरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचप्रमाणे जीडीएसएफदेखील धक्कादायक निकाल देण्याच्या परिस्थितीत दिसते. पप्पू यादव यांच्या पीडीए आघाडीच्या उमेदवारांसह डाव्या पक्षांनीदेखील तगडे आव्हान निर्माण केले आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती, सरकारविरोधी भावना अन् सक्षम विरोधी पक्षाच्या अभावामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी साठमारीत कोण कोणाला हरवणार व कोण कोणाला जिंकण्यासाठी मदत करणार, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. प्रत्येक पक्ष आपले जास्तीत जास्त उमेदवार आणून निकालानंतरच्या राजकारणात गुंतलेला दिसत आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्टार प्रचारक असतील. प्रचारासाठी स्थानिक नेत्यांकडून ज्यांची मागणी पक्ष मुख्यालयात येत आहे, त्यात राहुल गांधींना जास्त मागणी आहे. काँग्रेसच्या बहुतेक उमेदवारांनी राहुल गांधी यांना प्रचारासाठी बोलावण्याची ही पहिली वेळ आहे. प्रियांका गांधी यांनाही अनेक नेत्यांनी प्रचारासाठी पाठवण्याचा आग्रह पक्ष श्रेष्ठींकडे केला आहे.पक्ष नेतृत्वाने या मागणीची नोंद घेऊन राहुल गांधी बिहारमध्ये आठ ते दहा सभांमध्ये प्रचार करतील आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत रोड शो करतील, याशिवाय प्रियांका गांधी दोन सभांमध्ये प्रचार करू शकतील. राजद-काँग्रेस यांची युती असूनही आतापर्यंत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याराजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत संयुक्त सभेचे नियोजन झालेले नाही. प्रचारात भाग घेणाऱ्यांमध्ये तारिक अन्वर, शकील अहमद, मीरा कुमार, गुलामनबी आझाद, भूपेश बघेल, पी. एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, शत्रुघ्न सिन्हा आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी