शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 07:10 IST

अनेक लहान पक्ष मैदानात : कोण खाणार कोणाची मते

शीलेश शर्मा नवी दिल्ली: बिहार विधानसभेची यंदाची निवडणूक ही दुरंगी न राहता बहुरंगी बनली आहे. २०१५ च्या आधी लहान पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत होते; पण यंदासारखे त्यांचे तगडे आव्हान कधी पाहण्यास मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होत आहेत.

बिहारच्या राजकारणात पूर्वी काँग्रेसचा दबदबा त्यानंतर लालूप्रसाद यादव, नितीशकुमार यांचेच वर्चस्व राहिले आहे. २०१० च्या निवडणुकीनंतर भाजपनेदेखील आपली पकड घट्ट केली. २०१५ ची निवडणूक राष्ट्रीय जनता दल, जनता दल (यु), काँग्रेस व मित्र पक्षांच्या महागठबंधन विरोधात भाजप, एलजेपी यांच्या एनडीएमध्ये झाली होती. त्यावेळी एमआयएमसह इतर पक्षांनी उमेदवार दिले होते; पण त्यांना जनतेने महत्त्व दिल्याचे दिसले नाही.

यंदाच्या निवडणुकीत मात्र प्रत्येक मतदारसंघानुसार गणित बदललेले आहे. भाजप, जनता दलाची (यु) रालोआ कागदावर वरचढ दिसत असली तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र त्यांच्या उमेदवारांना राजद-काँग्रेस महागठबंधनसह जीडीएसएफ (उपेंद्रसिंह कुशवाह), एलजेपी, पीडीए (पप्पू यादव), एलजेपी (चिराग पासवान) या पक्षांच्या उमेदवारांचे कडवे आव्हान आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) प्रमुख रामविलास पासवान यांचे झालेले निधन व पासी समाजाकडून मिळत असलेले समर्थन, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेला पक्ष प्रवेश, केंद्रात मोदी; पण बिहारमध्ये नितीशऐवजी कोणी, अशा भूमिकेमुळे एलजेपी यावेळी गेमचेंजरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचप्रमाणे जीडीएसएफदेखील धक्कादायक निकाल देण्याच्या परिस्थितीत दिसते. पप्पू यादव यांच्या पीडीए आघाडीच्या उमेदवारांसह डाव्या पक्षांनीदेखील तगडे आव्हान निर्माण केले आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती, सरकारविरोधी भावना अन् सक्षम विरोधी पक्षाच्या अभावामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी साठमारीत कोण कोणाला हरवणार व कोण कोणाला जिंकण्यासाठी मदत करणार, याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. प्रत्येक पक्ष आपले जास्तीत जास्त उमेदवार आणून निकालानंतरच्या राजकारणात गुंतलेला दिसत आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्टार प्रचारक असतील. प्रचारासाठी स्थानिक नेत्यांकडून ज्यांची मागणी पक्ष मुख्यालयात येत आहे, त्यात राहुल गांधींना जास्त मागणी आहे. काँग्रेसच्या बहुतेक उमेदवारांनी राहुल गांधी यांना प्रचारासाठी बोलावण्याची ही पहिली वेळ आहे. प्रियांका गांधी यांनाही अनेक नेत्यांनी प्रचारासाठी पाठवण्याचा आग्रह पक्ष श्रेष्ठींकडे केला आहे.पक्ष नेतृत्वाने या मागणीची नोंद घेऊन राहुल गांधी बिहारमध्ये आठ ते दहा सभांमध्ये प्रचार करतील आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत रोड शो करतील, याशिवाय प्रियांका गांधी दोन सभांमध्ये प्रचार करू शकतील. राजद-काँग्रेस यांची युती असूनही आतापर्यंत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याराजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत संयुक्त सभेचे नियोजन झालेले नाही. प्रचारात भाग घेणाऱ्यांमध्ये तारिक अन्वर, शकील अहमद, मीरा कुमार, गुलामनबी आझाद, भूपेश बघेल, पी. एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, शत्रुघ्न सिन्हा आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी