शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020: ...म्हणून मला नितीश यांच्या सरकारची गरज आहे; पंतप्रधान मोदींचं बिहारी जनतेला पत्र

By कुणाल गवाणकर | Updated: November 5, 2020 18:47 IST

Bihar Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला; ७ तारखेला मतदान; १० तारखेला निकाल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबरला राज्यात अखेरच्या टप्प्यातलं मतदान होईल. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला पत्र लिहिलं आहे. बिहारचा विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावा यासाठी राज्यात नितीश कुमार सरकारची आवश्यकता असल्याचं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.राज्यात एनडीएचं सरकार आणा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी पत्राच्या माध्यमातून बिहारच्या जनतेला केलं आहे. 'कुशासनासाठी नव्हे,  सुशासनासाठी मतदान करायचं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हाच आपला मंत्र आहे. बिहारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतंय आणि मला नितीश कुमार यांच्या सरकारची गरज आहे,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. मोदींनी बिहारी जनतेला लिहिलेल्या पत्रात भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला आहे. 'एनडीए सरकारकडे विकासाची दृष्टी आणि आराखडा आहे. उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा केवळ एनडीए सरकारच देऊ शकतं,' असा विश्वास मोदींनी बिहारच्या जनतेला दिला आहे. अराजकतेच्या वातावरणात नवनिर्माण होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. '२००५ पासून बिहारमधील वातावरण बदललं आणि नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. राज्यासाठी सामाजिक आणि आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टी एनडीए सरकारच देऊ शकतं,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा