शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Bihar Election 2020: ...म्हणून मला नितीश यांच्या सरकारची गरज आहे; पंतप्रधान मोदींचं बिहारी जनतेला पत्र

By कुणाल गवाणकर | Updated: November 5, 2020 18:47 IST

Bihar Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला; ७ तारखेला मतदान; १० तारखेला निकाल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबरला राज्यात अखेरच्या टप्प्यातलं मतदान होईल. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला पत्र लिहिलं आहे. बिहारचा विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावा यासाठी राज्यात नितीश कुमार सरकारची आवश्यकता असल्याचं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.राज्यात एनडीएचं सरकार आणा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी पत्राच्या माध्यमातून बिहारच्या जनतेला केलं आहे. 'कुशासनासाठी नव्हे,  सुशासनासाठी मतदान करायचं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हाच आपला मंत्र आहे. बिहारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतंय आणि मला नितीश कुमार यांच्या सरकारची गरज आहे,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. मोदींनी बिहारी जनतेला लिहिलेल्या पत्रात भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला आहे. 'एनडीए सरकारकडे विकासाची दृष्टी आणि आराखडा आहे. उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा केवळ एनडीए सरकारच देऊ शकतं,' असा विश्वास मोदींनी बिहारच्या जनतेला दिला आहे. अराजकतेच्या वातावरणात नवनिर्माण होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. '२००५ पासून बिहारमधील वातावरण बदललं आणि नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. राज्यासाठी सामाजिक आणि आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टी एनडीए सरकारच देऊ शकतं,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा