शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Bihar Election 2020: ...म्हणून मला नितीश यांच्या सरकारची गरज आहे; पंतप्रधान मोदींचं बिहारी जनतेला पत्र

By कुणाल गवाणकर | Updated: November 5, 2020 18:47 IST

Bihar Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला; ७ तारखेला मतदान; १० तारखेला निकाल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबरला राज्यात अखेरच्या टप्प्यातलं मतदान होईल. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला पत्र लिहिलं आहे. बिहारचा विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावा यासाठी राज्यात नितीश कुमार सरकारची आवश्यकता असल्याचं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.राज्यात एनडीएचं सरकार आणा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी पत्राच्या माध्यमातून बिहारच्या जनतेला केलं आहे. 'कुशासनासाठी नव्हे,  सुशासनासाठी मतदान करायचं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हाच आपला मंत्र आहे. बिहारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतंय आणि मला नितीश कुमार यांच्या सरकारची गरज आहे,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. मोदींनी बिहारी जनतेला लिहिलेल्या पत्रात भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला आहे. 'एनडीए सरकारकडे विकासाची दृष्टी आणि आराखडा आहे. उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा केवळ एनडीए सरकारच देऊ शकतं,' असा विश्वास मोदींनी बिहारच्या जनतेला दिला आहे. अराजकतेच्या वातावरणात नवनिर्माण होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. '२००५ पासून बिहारमधील वातावरण बदललं आणि नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. राज्यासाठी सामाजिक आणि आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टी एनडीए सरकारच देऊ शकतं,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा