शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढली; नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली?

By प्रविण मरगळे | Updated: November 5, 2020 09:49 IST

Bihar Assembly Election, Narendra Modi, Nitish Kumar News: लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांना हाताळण्यात अपयश, पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये एनडीए निवडणूक हरली तर भाजपाला येणाऱ्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहेनितीशकुमार यांच्या विरोधी लाटेला ब्रेक लावण्यासाठी चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी पर्याय म्हणून उभी राहिली.

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे, बिहारमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि प्रचंड लोकप्रियता असूनही भाजपा नेतृत्व बिहारबद्दल चिंतेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष जेडीयूच्या नितीश कुमार यांची लोकप्रियतेचा आलेख घसरत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांना हाताळण्यात अपयश, पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहे. बिहारमध्ये एनडीए निवडणूक हरली तर भाजपाला येणाऱ्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नितीश कुमार यांच्या घसरत्या लोकप्रियतेबाबत भाजपाला माहिती नाही असं नव्हे, आरएसएस आणि भाजपाने केलेल्या सर्व अंतर्गत सर्वेक्षणांमध्ये हे स्पष्ट झालं होतं की बिहारमधील लोक आता नितीशकुमारांना पसंत करत नाहीत.

मोदी लाट पाहता बिहारमधील स्थानिक नेत्यांनी राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या नेत्यांची मागणी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जून-जुलैमध्ये बिहारमधील अनेक नेत्यांसोबत चर्चा केली होती. या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला की नितीश यांना सोडणे पक्षासाठी घातक होऊ शकतं. कारण नितीशकुमार हे लालू यादव यांचा पक्ष आरजेडी, कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीत सामील होण्याचा धोका होता, म्हणून हायकमांडने नितीशसमवेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. इतकचं नाही तर नितीशकुमार यांच्या विरोधी लाटेला ब्रेक लावण्यासाठी चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी पर्याय म्हणून उभी राहिली. चिराग पासवान हे नितीशविरोधी मतांना आरजेडी-कॉंग्रेस-डाव्या आघाडीत जाण्यापासून रोखतील या आशेने राजकारण केले गेले.

निवडणुकीचा प्रचाराला जसजसा वेग आला तसं नितीशकुमार यांच्या जेडीयूची लोकप्रियता घटत गेली. दुसरीकडे कोरोनानं भाजपाच्या अनेक नेत्यांना जाळ्यात ओढलं, सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस, सुशील मोदी, मंगल पांडे, राजीव प्रताप रुडी, शाहनवाज हुसेन आणि अन्य नेत्यांना कोरोनाची लागण झाली. अमित शहा अद्यापही बिहारमध्ये सक्रिय नाहीत. निवडणुकीचा पहिला टप्पा महायुतीच्या बाजूने गेला आहे तर दुसर्‍या टप्प्यातील एनडीएला दिलासा मिळताना दिसत आहे. या आठवड्यात भाजपा नेते बिहारमधील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेईल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार