शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Bihar Assembly Election Results: मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 13:27 IST

Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्ष जेडीयूला जोरदार फटका

पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर सकाळी सुसाट सुटलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची आता पिछेहाट होताना पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सध्याचे आकडे सांगत आहेत. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे.भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपचं सरकार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जेडीयूचे १४ मंत्री आहेत. तर १० जण भाजपचे आहेत. यातील भाजपचे जवळपास सगळेच मंत्री आघाडीवर आहेत. तर जेडीयूच्या मंत्र्यांची पिछेहाट सुरू आहे. चिराग पासवान यांच्या नेतृत्त्वाखालील लोकजनशक्ती पक्षामुळे अनेक ठिकाणी जेडीयूच्या अडचणी वाढल्या आहेत.बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढेसध्याच्या घडीला जेडीयूचे अर्धा डझन मंत्री पिछाडीवर आहेत. यातील बऱ्याच ठिकाणी तिरंगी लढत सुरू आहे. लोकजनशक्ती पक्षानं आव्हान दिल्यानं जेडीयूचे उमेदवार मागे आहेत. सहकार मंत्री जय सिंह दिनारा विधानसभा मतदारसंघात मागे आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी लोजपनं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय जहानाबादमध्ये कृष्णनंदन प्रसाद वर्मा (शिक्षण मंत्री), जमालपूरमध्ये शैलेश कुमार (ग्रामविकास मंत्री), राजपूरमध्ये संतोष कुमार निराला (परिवहन मंत्री), हथुआमध्ये रामसेवक सिंह (राज्यमंत्री) पिछाडीवर आहेत. तर बहादूरपूरमध्ये मदन सहानी (खाद्य मंत्री) अतिशय थोड्या मतांनी पुढे आहेत. या ठिकाणीही लोजपनं उमेदवार दिल्यानं जेडीयूचा फटका बसला आहे.तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊतमोदींचे हनुमान जेडीयूवर भारी पडले?बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधात शड्डू ठोकत भाजपसाठी सोयीस्कर ठरणारी भूमिका घेतली. आपण मोदींचे हनुमान अशी स्वत:ची ओळख ते सांगत होते. त्याचा फायदा पासवान यांना फारसा होताना दिसत नाही. मात्र जेडीयूचं नुकसान करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसत आहे. लोजपच्या मदतीनं भाजपचा जेडीयूवर बाण?भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. मात्र जागावाटपावरून लोजपानं राज्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. एनडीएच्या बाहेर पडल्यावर त्यांनी जेडीयूच्या विरोधात दंड थोपटले. जेडीयूचे उमेदवार असलेल्या सगळ्याच जागांवर त्यांनी उमेदवार दिले. त्याचा फटका जेडीयूला बसताना दिसत आहे.सध्याच्या मतमोजणीचे कल पाहता भाजपानं जेडीयूला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे लोजपनं जेडीयूच्या विरोधात भूमिका घेत असताना भाजपला आव्हान दिलं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपचा विजय सोपा झाला. तर लोजपच्या विरोधी भूमिकेचा फटका थेट जेडीयूला बसला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कुमारच मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट केलं. मात्र जेडीयूच्या जागा कमी झाल्यानं नव्या सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती असतील हे स्पष्ट आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी