शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Bihar Assembly Election Results: मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 13:27 IST

Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्ष जेडीयूला जोरदार फटका

पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर सकाळी सुसाट सुटलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची आता पिछेहाट होताना पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सध्याचे आकडे सांगत आहेत. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे.भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपचं सरकार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जेडीयूचे १४ मंत्री आहेत. तर १० जण भाजपचे आहेत. यातील भाजपचे जवळपास सगळेच मंत्री आघाडीवर आहेत. तर जेडीयूच्या मंत्र्यांची पिछेहाट सुरू आहे. चिराग पासवान यांच्या नेतृत्त्वाखालील लोकजनशक्ती पक्षामुळे अनेक ठिकाणी जेडीयूच्या अडचणी वाढल्या आहेत.बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढेसध्याच्या घडीला जेडीयूचे अर्धा डझन मंत्री पिछाडीवर आहेत. यातील बऱ्याच ठिकाणी तिरंगी लढत सुरू आहे. लोकजनशक्ती पक्षानं आव्हान दिल्यानं जेडीयूचे उमेदवार मागे आहेत. सहकार मंत्री जय सिंह दिनारा विधानसभा मतदारसंघात मागे आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी लोजपनं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय जहानाबादमध्ये कृष्णनंदन प्रसाद वर्मा (शिक्षण मंत्री), जमालपूरमध्ये शैलेश कुमार (ग्रामविकास मंत्री), राजपूरमध्ये संतोष कुमार निराला (परिवहन मंत्री), हथुआमध्ये रामसेवक सिंह (राज्यमंत्री) पिछाडीवर आहेत. तर बहादूरपूरमध्ये मदन सहानी (खाद्य मंत्री) अतिशय थोड्या मतांनी पुढे आहेत. या ठिकाणीही लोजपनं उमेदवार दिल्यानं जेडीयूचा फटका बसला आहे.तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊतमोदींचे हनुमान जेडीयूवर भारी पडले?बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधात शड्डू ठोकत भाजपसाठी सोयीस्कर ठरणारी भूमिका घेतली. आपण मोदींचे हनुमान अशी स्वत:ची ओळख ते सांगत होते. त्याचा फायदा पासवान यांना फारसा होताना दिसत नाही. मात्र जेडीयूचं नुकसान करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसत आहे. लोजपच्या मदतीनं भाजपचा जेडीयूवर बाण?भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. मात्र जागावाटपावरून लोजपानं राज्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. एनडीएच्या बाहेर पडल्यावर त्यांनी जेडीयूच्या विरोधात दंड थोपटले. जेडीयूचे उमेदवार असलेल्या सगळ्याच जागांवर त्यांनी उमेदवार दिले. त्याचा फटका जेडीयूला बसताना दिसत आहे.सध्याच्या मतमोजणीचे कल पाहता भाजपानं जेडीयूला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे लोजपनं जेडीयूच्या विरोधात भूमिका घेत असताना भाजपला आव्हान दिलं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपचा विजय सोपा झाला. तर लोजपच्या विरोधी भूमिकेचा फटका थेट जेडीयूला बसला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कुमारच मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट केलं. मात्र जेडीयूच्या जागा कमी झाल्यानं नव्या सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती असतील हे स्पष्ट आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी