शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Bihar Assembly Election Results: जागा झिरो, पण भाजपसाठी हिरो; 'मोदींच्या हनुमाना'चा नितीश कुमारांना दे धक्का 

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 21:09 IST

Bihar Assembly Election Results: भाजपच्या जागा वाढल्या; जेडीयूला मोठा धक्का

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. सध्याच्या घडीला एनडीएनं बहुमताचा आकडा ओलांडला आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात १४ जागांचं अंतर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भारतीय जनता पक्ष यंदा राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पहिल्या स्थानासाठी भाजप आणि राष्ट्रीय जनता दलात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.आतापर्यंत बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचा लहान भाऊ असलेल्या भाजपनं यंदा मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यात भाजपला लोकजनशक्ती पक्षाची मदत झाली. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणाऱ्या जेडीयूची यंदा पिछेहाट झाली आहे. सध्याच्या घडीला जेडीयू ४५ जागांवर पुढे आहे. तर भाजपनं ७३ जागांवर मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ५३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र यंदा थेट ७० च्या पुढे जात भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरताना दिसत आहे.भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. मात्र जागावाटपावरून लोजपानं राज्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. एनडीएच्या बाहेर पडल्यावर त्यांनी जेडीयूच्या विरोधात दंड थोपटले. जेडीयूचे उमेदवार असलेल्या सगळ्याच जागांवर त्यांनी उमेदवार दिले. त्याचा फटका जेडीयूला बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे लोजप अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वत:ला 'मोदींचा हनुमान' म्हटलं होतं.अमित शहांचा नितीश कुमारांना फोन; दिल्लीचे दूत मुख्यमंत्री निवासस्थानी हजरचिराग यांचा लोजप संध्याकाळच्या सुमारास ४-५ जागांवर आघाडीवर होता. मात्र सध्याच्या घडीला लोजपचा एकही उमेदवार पुढे नाही. त्यामुळे लोजप भोपळा फोडण्याची शक्यता कमी आहे. मात्र नितीश कुमार यांना थेट टक्कर देऊन स्वत: झिरोवर आलेला लोजप भाजपसाठी हिरो ठरला आहे. जेडीयूशी दोन हात करताना लोजपचं नुकसान झालं आहे. मात्र त्यांनीही जेडीयूचं मोठं नुकसान केलं आहे. १५ वर्षांतील ही जेडीयूची सर्वात वाईट कामगिरी आहे.मोदींचे हनुमान जेडीयूवर भारीबिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधात शड्डू ठोकत भाजपसाठी सोयीस्कर ठरणारी भूमिका घेतली. आपण मोदींचे हनुमान अशी स्वत:ची ओळख ते सांगत होते. त्याचा फायदा पासवान यांना फारसा होताना दिसत नाही. मात्र जेडीयूचं नुकसान करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल