शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये लढणार; पण 'ती' खास ओळख सोबत नसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:42 IST

Bihar Assembly Election 2020: शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.

मुंबई : शिवसेनेने बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नसल्याने निवडणूक आयोग ठरवेल त्या चिन्हावर त्यांना लढावे लागणार आहे.शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.बिहारमध्ये सत्तारुढ जदयुचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. अन्य पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले तर मतदारांचा गोंधळ होईल, असा आक्षेप जदयुने झारखंड मुक्ती मोर्चाबाबत घेतला होता. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा सत्तारुढ पक्ष असून त्याचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. जदयुचा हा आक्षेप मान्य करीत आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह देण्यास मनाई केली. तोच आदेश शिवसेनेलाही लागू राहील.सध्या नाही एकही जागाबिहारमध्ये उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा.प्रियांका चतुर्वेदींवर आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१५ च्या निवडणुकीत सेनेने ८० जागा लढविल्या. एकही जागा जिंकली नव्हती. सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून २,११,१३१ मते मिळाली होती. पक्षाचे सात उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना १,८५,४३७ मते मिळाली होती.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत