शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार LJPबाबत पहिल्यांदाच बोलले, चिराग पासवानांना खूप सुनावले, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: October 6, 2020 19:12 IST

एनडीएच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा करतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लोकजनशक्ती पार्टीची भूमिका आणि चिराग पासवान यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पाटणा - एनडीएचा घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने केलेली बंडखोरी आणि जागावाटपाबाबत सुरू असलेल्या तिढ्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी लांबलेले एनडीएचे जागावाटप अखेर आज जाहीर झाले. दरम्यान, जागावाटपाची अधिकृत घोषणा करतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लोकजनशक्ती पार्टीची भूमिका आणि चिराग पासवान यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.जागावाटपाची घोषणा केल्यानंतर चिराग पासवान यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता नितीश कुमार यांनी रोखठोक उत्तर दिले. ते म्हणाले की, रामविलास पासवान हे सध्या आजारी आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, ही आमची प्रार्थना आहे. मात्र रामविलास पासवान हे आमच्या मदतीशिवाय राज्यसभेवर निवडून गेले होते का? बिहार विधानसभेमध्ये लोकजनशक्ती पार्टीच्या किती जागा होत्या तर केवळ दोन. भाजपा आणि जेडीयूने त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. आमच्या मदतीशिवाय पासवान हे राज्यसभेत पोहोचले आहेत का, असा सवाल नितीश कुमार यांनी विचारला. किती मोठ्या प्रमाणात हत्या होत होत्या. सामूहिक नरसंहारासारख्या घटना होत होत्या. किती दंगे व्हायचे, हे सर्वांना माहिती आहे, असा टोला नितीश कुमार यांनी लगावला.दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. तर काही दिवसांपर्यंत एनडीएचा घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.या घोषणेनुसार बिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा आल्या आहेत. त्यापैकी जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल, तर जेडीयू ११५ जागांवर निवडणूक लढवेल. भाजपा आपल्या वाटल्या आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल.यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी सांगितले की, नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढवणार आहे आणि विजयी होऊन सरकार बनवणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका घेण्याची गरज नाही.

 

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपाLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टी