शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

"बंगालमध्ये दीदींचा खेळ संपला, TMC म्हणजे 'ट्रान्सफर माय कमिशन"; पंतप्रधान मोदींचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 09:35 IST

West Bengal Assembly Election 2021 And Narendra Modi : तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया येथे रॅलीला संबोधित केलं.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुरुलिया येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचं म्हणत निशाणा साधला. तसेत दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असं म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना सणसणीत टोला देखील लगावला आहे. 

"भाजपाचा डीबीटी डायरेक्ट बेनिफट ट्रान्सफर, तर TMC ट्रान्सफर माय कमिशन" बनली असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला आहे. केंद्रातील भाजप सरकार डीबीटी म्हणजे गरजूंना थेट मदत करणारी डायरेक्ट ट्रान्स्फर बेनेफिट योजना राबविते, तृणमूल काँग्रेस मात्र लोकांना लुटण्याचे काम करते, असे सांगताना मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव टीएमसी अर्थात ट्रान्सफर माय कमिशन असल्याची घणाघाती टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खेला होबे (खेळ होईल) या विधानसभा निवडणुकीच्या बहुचर्चित घोषणेला नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया येथील राज्यातील पहिल्या प्रचारसभेत विकास होबे (विकास होईल) असे उत्तर दिले.

ममतांच्या ‘खेला होबे’ला  मोदींकडून ‘विकास होबे’ उत्तर

दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत तृणमूल हाफ झाली, आता साफ होईल, अशीही तोफ डागली.  प. बंगाल विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचारसभा पुरूलियात मोदींनी गुरूवारी सकाळी घेतली आणि दुपारी आसाममध्ये करीमगंज येथे सभा घेतली.

"पुरुलियाचं प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्याशी जुनं नातं आहे. आज पुरुलियामध्ये पाण्याचा संघर्ष ही मोठी समस्या आहे. या ठिकाणी पाणी नसल्यानं शेती, पशूपालन करण्यास ससम्या निर्माण होत आहेत. तर पिण्याच्या पाण्याच्या समस्याही वाढत आहेत. या ठिकाणच्या लोकांना स्वत:च्या भरवशावर सोडून तृणमूल काँग्रेस आपला खेळ खेळण्यात व्यस्त आहे. त्यांनी पुरुलियाच्या लोकांना भेदभाव करणारं प्रशासन दिलं आणि सर्वात मागासलेलं क्षेत्रही बनवलं," असंही ते म्हणाले. 

पुरुलिया क्षेत्राची कनेक्टिव्हीटी सुधारण्याची आवश्यकता आहे. बंगालच्या प्रत्येक क्षेत्राला रेल्वे मार्गानं जोडण्याला आमचं प्राधान्य आहे. दोन मे नंतर जेव्हा भाजपचं सरकार सत्तेत येईल त्यानंतर रेल्वेच्या प्रकल्पांना गती येईल. पुरुलिया आणि आसपासच्या ठिकाणी अशी व्यवस्था केली जाईल की या ठिकाणाहून लोकांना दुसरीकडे जावं लागणार नाही. बंगालसाठी केंद्र सरकारनं 50 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण