शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Belgoan Election: “देवेंद्र फडणवीसांनी स्वत:ला महाराष्ट्रद्रोही असल्याचं सिद्ध केलं; त्यांच्याकडून अपेक्षाच नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 10:46 IST

लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकवणं ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाली आहे असं शुभम शेळकेंनी सांगितले.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात सामील होणं हेच आमचं ध्येय आहे. कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते. ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते तेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडे चार वर्ष लागली.शिवाजी महाराजांचा अपमान आणि भगव्या झेंड्याची विटंबना होते. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसांमध्ये चीड आहे.

बेळगाव – लोकसभेसाठी रिक्त झालेल्या जागेवर आज मतदान होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा लढा उभा राहिला. जे आमच्याविरोधात प्रचारासाठी बेळगावात आले त्यांनी स्वत:ला महाराष्ट्र्द्रोही असल्याचं सिद्ध केलं असा टोला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना(BJP Devendra Fadnavis) लगावला आहे. शुभम शेळकेंनी मतदान करून बाहेर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शुभम शेळके(Subham Shelke) म्हणाले की, महाराष्ट्रात सामील होणं हेच आमचं ध्येय आहे. कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते. शिवाजी महाराजांचा अपमान आणि भगव्या झेंड्याची विटंबना होते. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसांमध्ये चीड आहे. लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकवणं ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत बेळगाव प्रश्नाशी काँग्रेस आणि भाजपाला देणंघेणं नाही. हा प्रश्न काँग्रेसने उभा केला. ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते तेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडे चार वर्ष लागली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. जोपर्यंत सीमावासियांचा प्रश्न सुटत नाही. त्यांच्यावरील अन्याय थांबत नाही तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शुभम शेळके यांनी दिली.

शुभम शेळके स्पॉन्सर्ड उमेदवार

महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभेसाठी उमेदवार उभा करत नाही. सध्या त्यांच्या प्रचारात एकही जुने पदाधिकारी दिसत नाही. इथला मराठी माणूस भाजपाला मतदान करतो. ही मतं कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार उभा करण्याचं काम काही लोकांनी केले आहे असा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

काँग्रेसला जिंकवण्यासाठी शिवसेनेचा प्रचार

संजय राऊतांचा अजेंडा सध्या काँग्रेसला जिंकवणं एवढाच आहे. त्यासाठी बेळगावात प्रचाराला आले.  पोटनिवडणुकीत एक वरिष्ठ नेत्याचं निधन झालं आहे. त्यांची पत्नी याठिकाणी उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही हे माहिती आहे. त्यांनी कधी लोकसभा निवडणूक लढवली नाही. अलीकडच्या काळात शिवसेना काँग्रेस यांची जवळीक वाढली आहे. मुंबईत शिवसैनिक टीपू सुलतान जयंती साजरी करतात तर इथं काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते. त्यामुळे टीपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्यांना जिंकवण्यासाठी संजय राऊत बेळगावात प्रचाराला आले होते असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला होता.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस