शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अहमदनगरमध्ये विखे-पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:18 IST

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे अहमदनगर मतदारसंघाकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे.

- अण्णा नवथरराज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे अहमदनगर मतदारसंघाकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. भाजपकडून डॉ. सुजय विखे, तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप अशी ही लढत असून, राधाकृष्ण विखे आणि शरद पवार या दोघांच्याही प्रतिष्ठेचा हा सामना आहे.अहमदनगरमध्ये सुजय हे गत दोन वर्षांपासून तयारी करीत होते़ मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्याने त्यांनी पक्षांतर करून भाजपचा झेंडा हाती घेतला. विखे यांचे काँग्रेसमधील काही समर्थकही भाजपात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस काहीशी दुभंगली आहे. सुजय यांच्या पाठिशी भाजप-सेना व त्यांचे काँग्रेसमधील समर्थक अशी गोळाबेरीज आहे.सुजय हे न्युरो सर्जन असून तरुण आहेत. आपल्या शिक्षणाचा मुद्दा ते भाषणांमध्ये मांडत आहेत. सेना-भाजपच्या नेत्यांची त्यांनी मोट बांधली आहे. संग्राम हेही तरुण असून, त्यांचे वडील विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे दोन तरुणांमध्ये ही लढत आहे. दोन्हीही बाजूने प्रचारात जोरदार रंग भरला आहे़ सुजय यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नेते कामाला लावले आहेत. विखेंना भाजपमध्ये घेऊन आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींच्या नगरमधील सभेत सांगितले. मात्र, राधाकृष्ण विखे अद्याप भाजपमध्ये गेलेले नाहीत. सुजय यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज आहेत. त्यांची बंडखोरी थोपविण्यात विखे यांना यश आले आहे. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले हेही भाजपचे आमदार आहेत. ते विखे यांच्या प्रचारात सक्रिय दिसतात. त्यांची अडचण झाली आहे.

संग्राम यांची उमेदवारी पक्षाने अगदी अखेरच्या टप्प्यात जाहीर केली. त्यामुळे त्यांना मोर्चेबांधणीसाठी कमी वेळ आहे. असे असतानाही त्यांनी आपली यंत्रणा सक्रिय केली आहे. त्यांच्यामागेही तरुणांचे मोठे जाळे आहे. त्यांच्याही सभांना चांगला प्रतिसाद आहे. नगर महापालिका निवडणुकीत राष्टÑवादीने केवळ एक जाहीर सभा घेतली होती. असे असताना त्यांचे १८ नगरसेवक निवडून आले. जाहीर प्रचारावर अधिक भर न देता छुप्या पद्धतीने बांधणी करण्याचे जगताप यांचे तंत्र आहे. याही वेळी ते हीच पद्धत अवलंबत आहेत. त्यातच नगरची लढत शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे.
>दोन-तीन वर्षांपासून या मतदारसंघात काम करत आहे. मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी व मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपकडून उमेदवारी करीत आहोत. नगर दक्षिणेचा विकास आजवर खोळंबला. ते प्रश्न सोडविणार आहे.- डॉ़ सुजय विखे,उमेदवार, भाजप.>भाजपच्या कार्यपद्धतीला जनता कंटाळली आहे. शेतकरी, बेरोजगार हैराण आहेत. आमदार म्हणून नगर शहरात आपण भरीव काम केले. आपण स्थानिक असून सतत जनतेसाठी उपलब्ध असल्याने जनता दक्षिणेचाच खासदार निवडेल.- संग्राम जगताप,उमेदवार, राष्टÑवादी काँग्रेस.>कळीचे मुद्देपाणीप्रश्न व रोजगाराचा अभाव, जिल्ह्यातील सततचा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, चारा छावण्या, शहराचा रखडलेला विकास.नात्या-गोत्याचे राजकारण, आमदारांचा विकासकामांचा हिशोब, नगरचे विमानतळ या विषयावर सातत्याने प्रचाऱ

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sujay Vikheसुजय विखेSangram Jagtapआ. संग्राम जगताप