शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडणार; दिल्लीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 06:33 IST

Balasaheb Thorat : अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. पण नव्या बदलांमुळे ते पद चव्हाण यांना  मिळेल का याविषयी शंका आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेसचे प्रभारी पाटील यांच्या विषयी काय निर्णय होतो, याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी असलेल्या नाराजीमुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याच्या तयारीत असून, त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली आहे.

 पाटील मराठीत फारसे बोलत नाहीत. त्यांचे इंग्रजीत बोलणे अनेक आमदारांना समजत नाही. पक्षाचे चिटणीस बी.एम. संदीप हेदेखील कर्नाटकचे आहेत. तर वामशी रेड्डी आणि संपत कुमार हे तेलंगणाचे आहेत. हे चौघेही अहिंदी भाषिक असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचणी येत असल्याचे  काही आमदारांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षांना न कळवता परस्पर बैठका होतात. निर्णय होतात. त्यानंतर त्याची माहिती प्रदेशाध्यक्षांना मिळते. हा थोरात गटात नाराजीचा विषय आहे. थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे नेतेपद आणि महसूल मंत्री अशी तीन पदे आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे द्यावी, असे त्यांना वाटत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण त्यांनी आजच त्याचा इन्कार केला आहे.  तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या पदासाठी उत्सुक नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद द्यावे, असा आग्रह सुरुवातीला धरल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदावरून सतत होणाऱ्या चर्चांना विराम देण्यासाठी, नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची विनंती करण्यासाठी दिल्लीत आल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थोरात यांच्यावर विशेष मर्जी असली, तरीही विधान परिषदेच्या नावांसाठी त्यांचे फारसे ऐकले गेले नाही. 

शिवाय मुंबई कॉंग्रेसमध्ये जे बदल झाले त्यातही त्यांना फारसे विचारले गेले नाही, असाही एक सूर आहे. त्यात बांधकाममंत्री अशोक चव्हाण गटाची सरशी झाल्याचे बोलले जाते. पण मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मराठा समाजाकडे गेले. या निर्णयामुळे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अन्य कोणाकडेतरी द्यावे, अशी चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. पण नव्या बदलांमुळे ते पद चव्हाण यांना मिळेल का याविषयी शंका आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेसचे प्रभारी पाटील यांच्या विषयी काय निर्णय होतो, याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकच्या बाजूने भांडणारे नेतेn प्रदेशाध्यक्षांना डावलून प्रभारींकडून आमदारांना बोलावले जाते, बैठका घेतल्या जातात, असा त्यांच्या तक्रारींचा सूर आहे. शिवाय सीमाप्रश्नी कर्नाटकच्या बाजूने भांडणारे नेते अशी पाटील यांची ओळख आहे. n महाराष्ट्रात ही गोष्ट काँग्रेसला अडचणीची ठरू शकते. त्यामुळे प्रभारीच बदलण्याची गरज असल्याची चर्चा दिल्लीच्या कानावर घालण्यासाठी थोरात गेल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस