शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडणार; दिल्लीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 06:33 IST

Balasaheb Thorat : अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. पण नव्या बदलांमुळे ते पद चव्हाण यांना  मिळेल का याविषयी शंका आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेसचे प्रभारी पाटील यांच्या विषयी काय निर्णय होतो, याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी असलेल्या नाराजीमुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याच्या तयारीत असून, त्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली आहे.

 पाटील मराठीत फारसे बोलत नाहीत. त्यांचे इंग्रजीत बोलणे अनेक आमदारांना समजत नाही. पक्षाचे चिटणीस बी.एम. संदीप हेदेखील कर्नाटकचे आहेत. तर वामशी रेड्डी आणि संपत कुमार हे तेलंगणाचे आहेत. हे चौघेही अहिंदी भाषिक असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचणी येत असल्याचे  काही आमदारांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षांना न कळवता परस्पर बैठका होतात. निर्णय होतात. त्यानंतर त्याची माहिती प्रदेशाध्यक्षांना मिळते. हा थोरात गटात नाराजीचा विषय आहे. थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे नेतेपद आणि महसूल मंत्री अशी तीन पदे आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे द्यावी, असे त्यांना वाटत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण त्यांनी आजच त्याचा इन्कार केला आहे.  तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या पदासाठी उत्सुक नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद द्यावे, असा आग्रह सुरुवातीला धरल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदावरून सतत होणाऱ्या चर्चांना विराम देण्यासाठी, नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची विनंती करण्यासाठी दिल्लीत आल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थोरात यांच्यावर विशेष मर्जी असली, तरीही विधान परिषदेच्या नावांसाठी त्यांचे फारसे ऐकले गेले नाही. 

शिवाय मुंबई कॉंग्रेसमध्ये जे बदल झाले त्यातही त्यांना फारसे विचारले गेले नाही, असाही एक सूर आहे. त्यात बांधकाममंत्री अशोक चव्हाण गटाची सरशी झाल्याचे बोलले जाते. पण मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मराठा समाजाकडे गेले. या निर्णयामुळे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अन्य कोणाकडेतरी द्यावे, अशी चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. पण नव्या बदलांमुळे ते पद चव्हाण यांना मिळेल का याविषयी शंका आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेसचे प्रभारी पाटील यांच्या विषयी काय निर्णय होतो, याकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकच्या बाजूने भांडणारे नेतेn प्रदेशाध्यक्षांना डावलून प्रभारींकडून आमदारांना बोलावले जाते, बैठका घेतल्या जातात, असा त्यांच्या तक्रारींचा सूर आहे. शिवाय सीमाप्रश्नी कर्नाटकच्या बाजूने भांडणारे नेते अशी पाटील यांची ओळख आहे. n महाराष्ट्रात ही गोष्ट काँग्रेसला अडचणीची ठरू शकते. त्यामुळे प्रभारीच बदलण्याची गरज असल्याची चर्चा दिल्लीच्या कानावर घालण्यासाठी थोरात गेल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस