शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

“बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही”

By प्रविण मरगळे | Published: January 22, 2021 6:03 PM

यातच आता काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांचीच प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करावी अशी मागणी केली आहे

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, तरच पुढील वेळी राज्यात काँग्रेसचं सरकार येऊ शकेलमागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १२-१३ जागा येतील असं म्हटलं जात होतंअडचणीच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत ४४ जागांचे यश खेचून आणलं

मुंबई- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून पक्षात दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली, त्यात प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी थोरातांनी दर्शवली, सुरूवातीला पक्ष नेतृत्वाने बाळासाहेब थोरातांची मागणी फेटाळली, त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये पक्ष संघटनेत बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बाळासाहेब थोरात यांच्याजागी दुसऱ्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक करण्याची चर्चा आहे.

यात सर्वाधिक आघाडीचं नाव आहे ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विदर्भाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळावे अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. तर या पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पटोले इच्छुक आहेत, प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्चीही सोडण्याची तयारी दाखवली आहे. दिल्लीतील नेतृत्वानेही नाना पटोले यांच्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे, परंतु अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही.

यातच आता काँग्रेसच्या महिल्या नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांचीच प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करावी अशी मागणी केली आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे, तरच पुढील वेळी राज्यात काँग्रेसचं सरकार येऊ शकेल, ठाकूर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांकडे आपलं मत व्यक्त केले आहे. काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा आणि बी एम संदीप यांच्यासमोर हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्याचसोबत मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १२-१३ जागा येतील असं म्हटलं जात होतं, त्यावेळी कोणीही प्रदेशाध्यक्ष बनण्यास तयार नव्हतं, अडचणीच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत ४४ जागांचे यश खेचून आणलं, त्यामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढीलवेळी काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

नाना पटोलेंची स्वबळाची भाषा

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड निश्चित झाल्याचं समजलं आहे, त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी काँग्रेसच्या स्वबळाचं विधान केले आहे. राज्यात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितले, नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मला मिळेल ती प्रमाणिकपणे पार पाडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कसा येईल आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल" असं त्यांनी सांगितले.

नाना पटोलेंचं नाव हायकमांडकडून निश्चित?

राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं आघाडीवर आहेत. पण यातून नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसYashomati Thakurयशोमती ठाकूरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातNana Patoleनाना पटोले