शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

“तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत हो, तुम्ही तर...”; मनसेनं श्रीमंत कोकाटेंची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 11:40 IST

MNS : जातीपातीचे राजकारण करून लोकांना जगू द्यायचे नाही ही तुमची नीतिमत्ता आहे. तुम्ही जातीपातीचे राजकारण केले नसते तर खूप मोठे नेते झाले असते.

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुण्यातील मनसे आक्रमक झाली आहे. प्रविण गायकवाड आणि श्रीमंत कोकाटे(Shrimant Kokate) यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली होती. त्यावरून मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला. त्यावर श्रीमंत कोकाटे यांनी पुणे कुणाच्या बापाचं आहे का? असं म्हणत प्रतिआव्हान दिलं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. श्रीमंत कोकाटे यांच्या टीकेला मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी उत्तर दिलं आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, श्रीमंत नाव लावून कुणी श्रीमंत होत नसते, विचाराने, कृतीने श्रीमंत असावे लागते. तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत, तुम्ही तर दळीद्री विचाराचे आहात असा टोला त्यांनी कोकाटेंना लगावला आहे.

तसेच जातीपातीचे राजकारण करून लोकांना जगू द्यायचे नाही ही तुमची नीतिमत्ता आहे. तुम्ही जातीपातीचे राजकारण केले नसते तर खूप मोठे नेते झाले असते. पदवीधर निवडणुकीत आमच्यापेक्षाही कमी मते मिळाली. हे पाहून दळीद्री विचार संपवा आणि विचाराने कर्तृत्वाने श्रीमंत व्हा कोकाटे असा खोचक सल्लाही रुपाली पाटील ठोंबरे यांनी श्रीमंत कोकाटेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते श्रीमंत कोकाटे?

देशात लोकशाही आहे. आपल्याकडे अफगाणिस्तान सारखं तालिबानी राज्य आलेले नाही. राज ठाकरेंना दादरमध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे. तसेच प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना? त्यामुळे पुणे कोणाच्या बापाचं नाय हे मनसेने लक्षात ठेवावं. मनसेच्या राज ठाकरेंना वाटत असेल की पुरंदरेना लोटांगण घातले म्हणून आपण खूप मोठे झालो. तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो असं श्रीमंत कोकाटे म्हणाले होते.

प्रविण गायकवाड काय म्हणाले होते?

राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

'परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की ! असेही ते म्हणाले आहेत.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे