शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

विजयानंतरही भाजापाकडून आसाममध्ये मुख्यमंत्री बदलण्याची तयारी; या बड्या नेत्याचे नाव आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 16:38 IST

Assam Assembly Election 2021: आसाममधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महाजोत आघाडीचे आव्हान परतवून लावलेभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ७५ जागांवर विजय मिळाला आसाममधील विजयानंतर भाजपाकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याच्या हालचाली सुरू

नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आसाममधील सत्ता कायम राखण्यात भाजपाला यश आले होते. (Assam Assembly Election 2021) मात्र निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. येथे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal ) यांच्याऐवजी पूर्वोत्तर भारतात भाजपाचा विस्तार करणाऱ्या बड्या नेत्याकडे (Himanta Biswa Sarma ) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्याची तयारी पक्षनेतृत्वाकडून करण्यात येत आहे. (BJP ready to change CM in Assam even after victory; The name of Himanta Biswa Sarma is at the forefront for CM Post)

आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महाजोत आघाडीचे आव्हान परतवून लावले होते. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ७५ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, आसाममधील विजयानंतर भाजपाकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी दिग्गज नेते हेमंत बिस्वा शर्मा यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हेमंत बिस्वा शर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. 

राज्यात सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आज दिल्लीमध्ये आले होते. येथे त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.   

दरम्यान, नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ७५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५० जागांवर समाधान मानावे लागले होते. तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली होती.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाSarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालPoliticsराजकारण