शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

निवडणुकीतील आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:27 IST

Assam Assembly Elections 2021 : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले.

गुवाहाटी : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी ३९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. ६ एप्रिल रोजी अंतिम टप्प्यात ४० ठिकाणी मतदान होणार आहे. (Assam Assembly Elections 2021 )गुवाहाटीत कामाख्या मंदिरात पूजा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आमचा पक्ष भाजपासारखा नाही. काँग्रेस दिलेली आश्वासने पाळतो. आम्ही लोकांना पाच प्रमुख मुद्यांवर शब्द दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आसाममध्ये लागू करणार नाही, पाच लाख तरुणांना रोजगार, सर्व घरांमध्ये दर महिन्याला २०० युनिट वीज नि:शुल्क उपलब्ध करणे, प्रत्येक गृहिणीला २,००० रुपये महिन्याला साहाय्यता, चहा मळ्यातील कामगारांची किमान रोजंदारी १९३ रुपयांवरून वाढवून ३६५ रुपये करणे, ही आश्वासने दिली आहेत.  राहुल गांधी म्हणाले की, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटकात आमच्या पक्षाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण केले. छायगाव आणि बर्खेत्रीमध्ये निवडणूक रॅलीपूर्वी त्यांनी नीलांचलच्या शक्तिपीठ येथे पूजा केली. याठिकाणी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. खराब हवामानामुळे ते सिलचर, हफलाँग येथील रॅली करू शकले नाहीत.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस