शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Assam Assembly Election: पटनापासून १४०० किमीवर वसलेलं ‘मिनी बिहार’; जेथे बिहारी लोक बनवतात सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 08:29 IST

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं

ठळक मुद्देतिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होतातिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे.

पटना – बिहारमधून इतर राज्यात स्थलांतरण केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, कामानिमित्त बिहारमधून लोक बाहेरच्या राज्यात जातात आणि त्याठिकाणी आपली संख्या वाढवतात. त्यामुळे अनेक राज्यात बिहारी लोकांच्या लोकसंख्येवर तेथील स्थानिक राजकारण अवलंबून असतं. सध्या आसाम विधानसभा निवडणुकीत बिहारी लोकांचं वर्चस्व समोर येत आहे.

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं, याठिकाणी बिहारी लोकांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरते, तिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होता, यंदाही २०२१ च्या निवडणुकीत तिनसुकिया मतदारसंघात बिहारी मतदान निर्णायक भूमिकेत आहे.

आसाममधील तिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. हिरादेवी मूळच्या बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. १९८४ मध्ये लग्नानंतर हिरादेवी आसाममध्ये आल्या. तिनसुकिया जिल्ह्यातील त्या मोठ्या उद्योजिका आहेत. सध्या हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे.  याठिकाणी विद्यमान आमदार संजोय किशन हेदेखील मैदानात उतरले आहेत. मागील वेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार आणि सलग ३ वेळा आमदार राहिलेले राजेंद्र प्रसाद सिंह यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजेंद्र सिंह भाजपात सहभागी झाले होते, त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसने राजदसाठी सोडला आहे.

१५०० कुटुंब अधिक हिंदी भाषिकांची संख्या

तिनसुकिया जिल्ह्यात जवळपास १५०० कुटुंब असे आहेत, जे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेत, जिल्ह्यातील ११०० गावांपैकी ३०० गावात हिंदी भाषिक आहेत, अनेक जण आसाममध्ये तीन-चार पिढ्यापासून राहत आहेत. आसाममध्ये अनेकदा बिहारी लोकांमुळे स्थानिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत तेथे हिंसक आंदोलन घडले आहेत. तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे. येथे पहिल्यांदा राधाकृष्ण खेमका निवडून आले होते, ते २ वेळा आमदार होते, १९८५, १९९१ मध्ये येथून काँग्रेसचे शिव शंभू ओझा विजयी झाले, ते आसामच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांचे निकटवर्तीय होते.   

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार