शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Assam Assembly Election: पटनापासून १४०० किमीवर वसलेलं ‘मिनी बिहार’; जेथे बिहारी लोक बनवतात सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 08:29 IST

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं

ठळक मुद्देतिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होतातिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे.

पटना – बिहारमधून इतर राज्यात स्थलांतरण केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, कामानिमित्त बिहारमधून लोक बाहेरच्या राज्यात जातात आणि त्याठिकाणी आपली संख्या वाढवतात. त्यामुळे अनेक राज्यात बिहारी लोकांच्या लोकसंख्येवर तेथील स्थानिक राजकारण अवलंबून असतं. सध्या आसाम विधानसभा निवडणुकीत बिहारी लोकांचं वर्चस्व समोर येत आहे.

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं, याठिकाणी बिहारी लोकांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरते, तिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होता, यंदाही २०२१ च्या निवडणुकीत तिनसुकिया मतदारसंघात बिहारी मतदान निर्णायक भूमिकेत आहे.

आसाममधील तिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. हिरादेवी मूळच्या बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. १९८४ मध्ये लग्नानंतर हिरादेवी आसाममध्ये आल्या. तिनसुकिया जिल्ह्यातील त्या मोठ्या उद्योजिका आहेत. सध्या हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे.  याठिकाणी विद्यमान आमदार संजोय किशन हेदेखील मैदानात उतरले आहेत. मागील वेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार आणि सलग ३ वेळा आमदार राहिलेले राजेंद्र प्रसाद सिंह यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजेंद्र सिंह भाजपात सहभागी झाले होते, त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसने राजदसाठी सोडला आहे.

१५०० कुटुंब अधिक हिंदी भाषिकांची संख्या

तिनसुकिया जिल्ह्यात जवळपास १५०० कुटुंब असे आहेत, जे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेत, जिल्ह्यातील ११०० गावांपैकी ३०० गावात हिंदी भाषिक आहेत, अनेक जण आसाममध्ये तीन-चार पिढ्यापासून राहत आहेत. आसाममध्ये अनेकदा बिहारी लोकांमुळे स्थानिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत तेथे हिंसक आंदोलन घडले आहेत. तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे. येथे पहिल्यांदा राधाकृष्ण खेमका निवडून आले होते, ते २ वेळा आमदार होते, १९८५, १९९१ मध्ये येथून काँग्रेसचे शिव शंभू ओझा विजयी झाले, ते आसामच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांचे निकटवर्तीय होते.   

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार