शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

Video - "हिंमत असेल तर भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी सैनिकांवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 14:36 IST

Asaduddin Owaisi And BJP : असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हैदराबाद : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हिंमत असेल तर भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी सैनिकांवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा" असं म्हणत ओवैसींनी भाजपावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी निशाणा साधला होता.

"भाजपाने निवडणुका जिंकल्यानंतर हैदराबादच्या लोकांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा वचन दिलं आहे. भाजपा आपलं हे शौर्य लडाखमध्ये का दाखवत नाही, जिथे चीनने भारतीय जमिनीवर कब्जा केला आहे" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच असदुद्दीन ओवैसी यांनी आपला एक व्हिडिओही ट्विट केला आहे. "लडाखमध्ये चीनी सैनिकांनी भारताच्या जमिनीवर कित्येक महिन्यांपासून ठाण मांडलं आहे. येथे सर्जिकल स्ट्राईक करून दाखवावं, पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचं नावदेखील घेत नाहीत" असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

"चीनवर सर्जिकल स्टाईक केलं तर आम्ही देखील कौतुक करू. चीनी सैनिकांना तिथून उखडून फेका. पण तेथं जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणार नाहीत. मात्र तुमचे नेते एका जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत करतील, तुम्ही काय सर्जिकल स्ट्राईक करणार, तुम्ही या शहरासाठी केलंच काय आहे?" असं देखील असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच याआधी असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. जर तुम्ही 30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढं सर्व होईपर्यंत काय करत होते?, झोपा काढत होते का? असा सणसणीत टोला ओवैसींनी लगावला आहे. 

"30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद, एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?"

सोमवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. "मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यावेळी काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? 30 ते 40 हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी" असं आव्हान ओवैसी यांनी दिलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी "द्वेष निर्माण करणं हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. हा वाद हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये आहे. आता कोण जिंकणार हे तुम्हीच ठरवणार आहात" असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन