शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उसका भगवा मेरे भगवे से जादा भगवा कैसा?

By यदू जोशी | Updated: November 21, 2020 11:20 IST

Shiv Sena, BJP, BMC Election News: मुंबईत मराठी टक्का कमी होण्याचं कारण काय? पश्चिम बंगालमध्ये माकपची सत्ता असताना मुखर्जी त्याचं घर बॅनर्जीलाच विकेल हे माकपवाले जातीनं पहायचे, मुंबईत शाखाप्रमुख, आमदार बिल्डरांचे भागिदार झाले अन् वाघाचा चावा कमी झाला.

ठळक मुद्देमुंबई भाजपच्या गळ्यातील चंद्रहार आहे असं  प्रमोद महाजन म्हणायचे. तो चंद्रहार गळ्यात घालण्यासाठी भाजप सगळी ताकद पणाला लावेल.कधी मायावती तर कधी मेहबुबा मुफ्तींबरोबर बसणाऱ्या भाजपच्या हिंदुत्वाची यत्ता कंची हा सवाल शिवसेना करेल.अमराठी लोकांची चाकरी करतो पण या शेठ, भैय्या, दाक्षिणात्यांच्या छाताड्यावर माझा भगवा आहे या अस्मितेला शिवसेना हात घालते आणि जिंकते.

यदु जोशी

मुंगी आणि मुंबई कधीही थांबत नाही असं म्हणतात आणि ते खरेही आहे. ट्वेन्टी फोर बाय सेवन धावणारी मुंबई कोरोनाच्या काळात  मंदावली पण थांबली नाही. थांबणं माहिती नसलेलं हे शहर राज्याच्या राजधानीचं आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं आहे पण राजकीयदृष्ट्या ते कोणाचं याचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली आहे. ‘उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे?’ अशी एका डिटर्जन्ट पावडरची जाहिरात आहे. त्याच धर्तीवर,‘ उसका भगवा मेरे भगवे से जादा भगवा कैसा’ असा सवाल खडा दोन भगवे पक्ष एकमेकांना करू लागले आहेत.  तीस वर्षे पाटाला पाट लावून बसलेले शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे. मुंबई महापालिकेवर आता भाजपचाच भगवा फडकेल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर ‘भाजपचा भेसळयुक्त भगवा मुंबईकर फडकू देणार नाहीत’ असं प्रतिआव्हान शिवसेनेने दिलं आहे.

पुढच्या महिन्यात आपल्याकडे विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक होतेय. त्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढताहेत. ती एक अ‍ॅसिड टेस्ट असेल पण नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाईल का ते अधिक महत्त्वाचे असेल.

२०२२ च्या सुरुवातीला मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांचा फड रंगेल. कुठेही भाजप-शिवसेना  एकत्र येतील असं वाटत नाही. मुंबई महापालिकेचं बजेट ३९ हजार कोटी रुपयांचं आहे आणि ती शिवसेनेची जीवनरेखा आहे. कथेमध्ये राजाचा जीव पोपटाच्या कंठात होता तसा शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे. गेल्या खेपेला दोन पक्षांमध्ये दोनचार जागांचच अंतर होतं. केंद्रात आणि राज्यात दोघे एकत्र होते आणि कुठलीही खळखळ न करता भाजपनं शिवसेनेकडे सत्ता जाऊ दिली होती. यावेळी मात्र शिवसेनेची ही जीवनरेखा तोडण्याचा भाजपचा गेमप्लॅन असेल. मुंबईत मराठी टक्का आता बराच खाली आला आहे. जाणकार सांगतात की गेल्यावेळी तो २७ टक्के होता आणि आता २३ टक्क्यांवर आला आहे. मराठी मतदार शिवसेनेभोवती दरवेळी एकवटत आला आहे. शिवसेनेनं भावनिक साद घालत, कधी मुंबई खतरे में है सांगत, कधी भावनिकतेला हिंदुत्वाची फोडणी देत वरचष्मा टिकवला. मुंबईत सर्वात समस्याग्रस्त मराठी माणूस आहे. तो चाळीत राहतो.

अमराठी लोकांची चाकरी करतो पण या शेठ, भैय्या, दाक्षिणात्यांच्या छाताड्यावर माझा भगवा आहे या अस्मितेला शिवसेना हात घालते आणि जिंकते. अर्थात, शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली पक्षसंघटना, शाखांचा लोकांशी असलेला कनेक्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत टिकून आहे हे वर्षानुवर्षे बिंबवण्यात आलेलं यश ही जमेची बाजू आहेच. मुंबईत मराठी टक्का कमी होण्याचं कारण काय? पश्चिम बंगालमध्ये माकपची सत्ता असताना मुखर्जी त्याचं घर बॅनर्जीलाच विकेल हे माकपवाले जातीनं पहायचे, मुंबईत शाखाप्रमुख, आमदार बिल्डरांचे भागिदार झाले अन् वाघाचा चावा कमी झाला.

यावेळची निवडणूक फक्त मराठीच्या मुद्यावर लढून भगवा फडकवता येणार नाही याची कल्पना असल्यानं आदित्य ठाकरे पक्षाचा बेस वाढवण्याचा प्रयत्न करताहेत पण त्यासाठी त्यांना त्यांच्याच वयाचे असलेल्या तेजस्वी यादवांसारखा करिष्मा करून दाखवावा लागेल. दरबारी संस्कृती टाळावी लागेल. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेची जास्तीतजास्त अडचण मुंबई आणि औरंगाबादमध्ये करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. उद्या मुंबईत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी झाली तर शिवसेनेचं हिंदुत्व भाजपकडून संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल. भगव्याचा रंग शिवसेनेनं फिका केल्याची टीका ते करतील.

कधी मायावती तर कधी मेहबुबा मुफ्तींबरोबर बसणाऱ्या भाजपच्या हिंदुत्वाची यत्ता कंची हा सवाल शिवसेना करेल. दोन भगव्या पक्षांमध्ये घमासान अटळ आहे. मुंबईची लढाई ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असेल. तिथे ते सत्ता टिकवू शकले तर पुढची दहा वर्ष त्यांना मागे वळून पाहावं लागणार नाही. शिवसेना-काँग्रेस हे दोन परंपरागत प्रतिस्पर्धी एकत्र अन् शिवसेना-भाजप हे परंपरागत मित्र एकमेकांच्या विरोधात अशी लढाई रंजक राहील. गेल्यावेळी राज्यातील सत्तेचं बळ मुख्यत्वे भाजपच्या पाठीशी होतं यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी असेल. शिवाय उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार राहिले तर ताकद आणखीच वाढेल. मुंबईत अनेक वर्षे भाजप हा शिवसेनेच्या आडोशाने राहिला अन् नंतर शिवसेना व काँग्रेस या दोन्हींच्या व्होट बँकेत घुसून त्यांनी स्वत:ची जागा तयार केली. घाटकोपर, मालाड मुलुंड बोरीवली कांदिवली मुंबादेवी, काळबादेवीच्या पलिकडे त्याचा विस्तार केव्हाच झाला. मुंबई भाजपच्या गळ्यातील चंद्रहार आहे असं  प्रमोद महाजन म्हणायचे. तो चंद्रहार गळ्यात घालण्यासाठी भाजप सगळी ताकद पणाला लावेल.

या सगळ्यात कळीचा मुद्दा असेल तो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय करतील? मनसेकडे तेवढं नेटवर्क नाही पण मॅग्नेट असलेला नेता आहे. कृष्णकुंजवरची सध्याची गर्दी तेच सांगत आहे. ते सत्तेबाहेरची सत्ता आहेत. भाजपनं राज यांना डोळा मारला अन् त्यांनी प्रतिसाद दिला तर चित्र वेगळं असेल.  आता दोघंही नकार देताहेत पण निवडणूक जवळ येईल तसं नवीन समीकरण दिसू शकेल. मुंबईची सत्ता मातोश्रीवर की दादरच्या भाजप कार्यालयात याचा फैसला दोघांच्या मध्ये असलेल्या कृष्णकुंजवर बराचसा अवलंबून असेल. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक