शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जनतेत मोदी विरोधी सुप्त लाट : नितीन राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:52 IST

राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या, सामुहिक उन्मादामुळे (मॉब लिंचिंग) हत्यांकडाच्या घटनांत वाढ झाली, पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होऊ लागल्या, देशात काळे धन येण्या ऐवजी नोटबंदीमुळे काळ््याचे पांढरे केले गेले. अशा सर्व घटनांमुळे प्रचारातून विकासाचा मुद्दा हद्दपार झाला आहे. त्यामुळे लोकांना आता मोदी नकोसे झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात मोदी विरोधी सुप्तलाट असल्याचे मत कॉंग्रेसच्या दलित सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि रोजगार हमीचे माजी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.     राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे. जम्मू कामीर येथील ३७० कलम काढून टाकणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा सरकार आणू पहात आहे. ईशान्य भारताला देखील ३७० कलमासारखा विशेष दर्जा आहे. तेथे मात्र, मोदी वेगळी भूमिका घेताना दिसतात. उलट ईशान्य भारतात वेगळा ध्वज देण्यासही ते तयार आहेत. देशामधे नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या पुरोगामी आणि विचारवंतांची हत्या होत आहे. गो मांस बाळगल्याच्या संशयावरुन लोकांना मारले जात आहे. सामाजिक उन्मादाच्या घटनांतही वाढ झाली आहे. या सर्वांमुळे नागरिक मोदींविरोधात जाऊ लागले आहेत. त्यामुळे, देशभरात मोदींविरोधात लाट दिसून येत आहे. अगामी लोकसभेच्या निवडणूकीत मोदींविरोधात मतासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपाच्या फायद्यासाठीच आंबेडकर आले नाहीत

भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाच ते सहा जागा देण्यास आघाडीची तयारी होती. मात्र, त्यांनाच सोबत यायचे नव्हते. त्यांची भूमिका संविधान विरोधी दिसत आहे. अन्यथा भाजपाचा पराभव करण्यासाठी ते आघाडीसोबत असते. उलट, भाजपाच्या फायद्यासाठीच ते आघाडीसोबत आले नसल्याची टीका नितीन राऊत यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Rautनितीन राऊतBJPभाजपा