शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

पोटनिवडणुकांमध्ये दिसला जनतेचा भाजपाविरोधी कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:56 IST

पाच वर्षांपूर्वीच्या नरेंद्र मोदी लाटेत भारतीय जनता पार्टीने झारखंडमधील लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा जिंकल्या.

-ललित झांबरेपाच वर्षांपूर्वीच्या नरेंद्र मोदी लाटेत भारतीय जनता पार्टीने झारखंडमधील लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा जिंकल्या. त्यानंतर झारखंडच्या इतिहासात विधानसभेतही प्रथमच पूर्ण बहुमताचे भाजपा सरकार आले. रघुवर दास यांच्या सरकारने निर्विघ्नपणे पाच वर्षेसुद्धा पूर्ण केली. हेही झारखंडमध्ये पहिल्यांदाच घडले.राजकीय अस्थिरतेमुळे झारखंडचा विकास खुंटला, याबद्दल एकमत असताना गेल्या पाच वर्षांत स्थिर सरकार असूनही झारखंडच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. जनताही फारशी समाधानी दिसत नाही. गेल्याच वर्षी राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांत भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही हे जनतेच्या नाराजीचेच निदर्शक मानले गेले. कोलबीराच्या पोटनिवडणुकीत काँग़्रेसचे यश येत्या काळात काय होणार याचे निदर्शक यासाठी की २०१४ मध्ये याच मतदरासंघात काँग्रेसला केवळ ८.६६ टक्के मते, भाजपाला २५.७४ आणि झारखंड पार्टीला ३९.५८ टक्के मते होती मात्र पोटनिवडणुकीत काँग़्रेसनेच ३३.९३ टक्के मते मिळवून दाखवली आणि त्यामुळे लोकसभा निवडणुका २०१४ प्रमाणे एकतर्फी नसतील असा इशाराच भाजपाला मिळाला.गेल्या राज्यसभा निवडणुकीपासून काँग़्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात जवळीक वाढत चालली असल्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपाच्या नेत्यांनाही बहुधा याची जाणीव आहे म्हणूनच मुख्यमंत्री रघुवर दास यांनी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात सर्वांना सुखावणाऱ्या घोषणा केल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री सुकन्या योजना, मुख्यमंत्री मेधा शिष्यवृत्ती योजना, शेतकºयांसाठी मुख्य्यमंत्री कृषी आशीर्वाद योजना, महिला सशक्तीकरणासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पासह ८८९८ कोटी रूपयांची तरतूद यांचा समावेश आहे. याशिवाय एम्सची निर्मिती, सध्याच्या तीनशिवाय राज्यामध्ये आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालये, प्रत्येक जिल्ह्यात कोल्डरूम अशा घोषणा राज्य सरकारने केल्या आहेत. परंतु पोटनिवडणुकांचे निकाल, झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसची झालेली जवळीक आणि हेमंत सोरेन यांनी बदललेला झामुमोचा चेहरामोहरा पाहता आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाला गेल्या वेळेसारखेच घवघवीत यश मिळणे अवघडच दिसत आहे.अंडी योजना ठरणार नामुष्कीची!रघुवर दास यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात बºयाच लोकप्रिय घोषणा केल्या असल्या तरी केंद्र व राज्यात भाजपाचेच बहुमताचे सरकार असूनही केवळ त्यांना निधीअभावी माध्यान्ह शालेय पोषण आहाराद्वारे विद्यार्थ्यांना आठवड्याला तीन अंडी देण्याची योजना गुंडाळावी लागली.झारखंड हे आदिवासीबहुल राज्य आहे आणि राज्यात कुपोषणाची समस्या गंभीर असताना भाजपा सरकार अंडीसुद्धा पुरवू शकत नाही, तर इतर योजनांची काय स्थिती असेल? असे असूनही भाजपा सरकारने राज्यात दरवर्षी दरडोई उत्पन्न वाढत असल्याचा दावा केलेला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस