शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

भाजपला २१ जागा देण्याची अण्णा द्रमुकची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 05:05 IST

तामिळनाडू : ६० जागा देता येणार नाहीत

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी किमान ६० जागा मिळाव्यात, असा आग्रह भाजपने धरला असला तरी आपण २१ मतदारसंघच तुमच्यासाठी सोडू शकू, त्याहून अधिक जागा सोडणे शक्य नसल्याचे अण्णा द्रमुकने स्पष्ट केले आहे.  

राज्यात अण्णा द्रमुकशी आघाडी करण्याचे भाजपने ठरविले आहे. अण्णा द्रमुकने पीएमकेसाठी २३ जागा सोडल्या असून, तामिळ मनिला काँग्रेस व डीएमडीकेसाठी १५ जागा सोडल्या जातील. त्यामुळे भाजपला २१ जागाच  देता येतील, असे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री ओ. पी. पन्नीरसेल्वम यांनी रविवारी रात्री अमित शहा यांना सांगितले. 

 राज्यात विधानसभेच्या २३४ जागा आहे. या तीन पक्षांना मिळून ३८ व भाजपला २१ जागा सोडल्यानंतर अण्णा द्रमुकला सुमारे १७५ जागाच लढवता येतील. पक्षाची ताकद व इच्छुकांची संख्या पाहता या जागा फारच कमी आहेत. त्यामुळे याहून अधिक जागांसाठी भाजपने आग्रह धरू नये, अशी अण्णा द्रमुकची इच्छा आहे. 

द्रमुक काँग्रेस चर्चा सुरूराज्यात द्रमुक, काँग्रेस व डावे पक्ष यांचीही आघाडी असून, जागावाटपाबाबत सोमवारी बोलणी सुरू झाली. द्रमुकचे नेते टी. आर. बालू हे काँग्रेस व डाव्या पक्षांशी चर्चा करीत आहेत. या आघाडीत वायको यांचा एमडीएमके व मुस्लीम लीग हेही आहेत. 

आठ टप्प्यांत मतदान निर्णयाला आव्हानकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आठ टप्प्यांमध्ये घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याचिकेद्वारे आव्हान दिले गेले. वकील एम.एल. शर्मा यांनी केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, घटनेतील कलम १४ (जगण्याचा हक्क) आणि कलम २१ (जगण्याचा हक्क)चे उल्लंघन होत असल्यामुळे आठ टप्प्यांत निवडणूक घेण्यास आयोगाला प्रतिबंध करणारा आदेश दिला जावा.

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा