शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

भाजपला २१ जागा देण्याची अण्णा द्रमुकची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 05:05 IST

तामिळनाडू : ६० जागा देता येणार नाहीत

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी किमान ६० जागा मिळाव्यात, असा आग्रह भाजपने धरला असला तरी आपण २१ मतदारसंघच तुमच्यासाठी सोडू शकू, त्याहून अधिक जागा सोडणे शक्य नसल्याचे अण्णा द्रमुकने स्पष्ट केले आहे.  

राज्यात अण्णा द्रमुकशी आघाडी करण्याचे भाजपने ठरविले आहे. अण्णा द्रमुकने पीएमकेसाठी २३ जागा सोडल्या असून, तामिळ मनिला काँग्रेस व डीएमडीकेसाठी १५ जागा सोडल्या जातील. त्यामुळे भाजपला २१ जागाच  देता येतील, असे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री ओ. पी. पन्नीरसेल्वम यांनी रविवारी रात्री अमित शहा यांना सांगितले. 

 राज्यात विधानसभेच्या २३४ जागा आहे. या तीन पक्षांना मिळून ३८ व भाजपला २१ जागा सोडल्यानंतर अण्णा द्रमुकला सुमारे १७५ जागाच लढवता येतील. पक्षाची ताकद व इच्छुकांची संख्या पाहता या जागा फारच कमी आहेत. त्यामुळे याहून अधिक जागांसाठी भाजपने आग्रह धरू नये, अशी अण्णा द्रमुकची इच्छा आहे. 

द्रमुक काँग्रेस चर्चा सुरूराज्यात द्रमुक, काँग्रेस व डावे पक्ष यांचीही आघाडी असून, जागावाटपाबाबत सोमवारी बोलणी सुरू झाली. द्रमुकचे नेते टी. आर. बालू हे काँग्रेस व डाव्या पक्षांशी चर्चा करीत आहेत. या आघाडीत वायको यांचा एमडीएमके व मुस्लीम लीग हेही आहेत. 

आठ टप्प्यांत मतदान निर्णयाला आव्हानकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आठ टप्प्यांमध्ये घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याचिकेद्वारे आव्हान दिले गेले. वकील एम.एल. शर्मा यांनी केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, घटनेतील कलम १४ (जगण्याचा हक्क) आणि कलम २१ (जगण्याचा हक्क)चे उल्लंघन होत असल्यामुळे आठ टप्प्यांत निवडणूक घेण्यास आयोगाला प्रतिबंध करणारा आदेश दिला जावा.

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा