शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

“होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी…” दानवेंच्या टीकेला अनिल देशमुखांचं खास शैलीत उत्तर

By प्रविण मरगळे | Updated: October 7, 2020 17:15 IST

BJP Raosaheb Danve, Home Minister Anil Deshmukh News: रावसाहेब दानवेंच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला

ठळक मुद्देशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातले आघाडी सरकार म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकारएकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही तरी काय करणार - दानवेमहाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे - देशमुख

मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातील आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती, पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, मात्र या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे म्हणत आहेत ते बरोबर आहे असं सांगत त्यांनी चिमटा काढला आहे.

याबाबत अनिल देशमुखांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी! अशा खास शैलीत त्यांनी समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातले आघाडी सरकार म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकार आहे, आम्हाला हे सरकार पाडायचं नाही, परंतु तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही तरी काय करणार असा टोला त्यांना महाविकास आघाडीला लगावला होता.

केंद्राच्या शेती विधेयकांना महाराष्ट्रातच कोणताच विरोध नाही हे दिसत आहे, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींचीच या विधेयकातून अंमलबजावणी झालेली आहे. खुद्द शरद पवार यांनीही विधेयकातील मुद्द्यांचा आग्रह धरला होता. त्यांचा तोच जुना व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चिला जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं, आम्हाला विरोधकांची भीती नाही पण त्यांच्या अपप्रचाराबाबत आम्ही स्पष्टीकरण नक्की देऊ असं दानवे म्हणाले.

तसेच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात भाजपाच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली नसल्याचं दानवेंनी सांगितले. हाथरस येथील घटना अतिशय वाईट असून या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने सुरुवातीला तिथे कोणाला जावू दिले नाही, मात्र ही चौकशी पूर्ण झाल्यावर सर्वांना तेथे जाऊ दिले. मात्र हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारची भूमिका, भाजपा खासदाराने घेतलेली आरोपींची भेट यासंबंधीच्या प्रश्नांना दानवे यांनी बगल दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना