शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

“होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी…” दानवेंच्या टीकेला अनिल देशमुखांचं खास शैलीत उत्तर

By प्रविण मरगळे | Updated: October 7, 2020 17:15 IST

BJP Raosaheb Danve, Home Minister Anil Deshmukh News: रावसाहेब दानवेंच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला

ठळक मुद्देशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातले आघाडी सरकार म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकारएकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही तरी काय करणार - दानवेमहाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे - देशमुख

मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातील आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती, पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, मात्र या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे म्हणत आहेत ते बरोबर आहे असं सांगत त्यांनी चिमटा काढला आहे.

याबाबत अनिल देशमुखांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी! अशा खास शैलीत त्यांनी समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातले आघाडी सरकार म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकार आहे, आम्हाला हे सरकार पाडायचं नाही, परंतु तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही तरी काय करणार असा टोला त्यांना महाविकास आघाडीला लगावला होता.

केंद्राच्या शेती विधेयकांना महाराष्ट्रातच कोणताच विरोध नाही हे दिसत आहे, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींचीच या विधेयकातून अंमलबजावणी झालेली आहे. खुद्द शरद पवार यांनीही विधेयकातील मुद्द्यांचा आग्रह धरला होता. त्यांचा तोच जुना व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चिला जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं, आम्हाला विरोधकांची भीती नाही पण त्यांच्या अपप्रचाराबाबत आम्ही स्पष्टीकरण नक्की देऊ असं दानवे म्हणाले.

तसेच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात भाजपाच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली नसल्याचं दानवेंनी सांगितले. हाथरस येथील घटना अतिशय वाईट असून या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने सुरुवातीला तिथे कोणाला जावू दिले नाही, मात्र ही चौकशी पूर्ण झाल्यावर सर्वांना तेथे जाऊ दिले. मात्र हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारची भूमिका, भाजपा खासदाराने घेतलेली आरोपींची भेट यासंबंधीच्या प्रश्नांना दानवे यांनी बगल दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना