शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"तुमच्यावरील आरोपांमुळे आमची प्रतिमा मलिन होतेय", काँग्रेसच्या नेत्याने शिवसेना, एनसीपीला सुनावले

By बाळकृष्ण परब | Updated: January 10, 2021 17:20 IST

Maharashtra Politics Update : वर्षभराच्या कारभारानंतर आता महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या कारणावरून खटके उडत आहेत.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा होत आहेअशा परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे काँग्रेस आणि जनतेचे नुकसान होत आहेत्यामुळे या सरकारमध्ये कायम राहण्याचे कुठलेही औचित्य दिसत नाही. ही आघाडी काँग्रेससाठी नुकसानकारक दिसत आहे

मुंबई - भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील सत्ता हातात घेऊन एक वर्षाचा अवधी उलटून गेला आहे. वर्षभराच्या कारभारानंतर आता महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या कारणावरून खटके उडत आहेत. त्यातच आता मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी पक्षाच्या हायकमांड यांना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीत वादाची अजून एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत असल्याचे विश्वबंधू राय यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनी वेळीच याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्याबरोबरच महाविकास आघाडीमध्ये विश्वास आणि सामंजस्याचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात विश्वबंधू राज म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे काँग्रेस आणि जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये कायम राहण्याचे कुठलेही औचित्य दिसत नाही. ही आघाडी काँग्रेससाठी नुकसानकारक दिसत आहे.येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मित्रपक्षांच्या चुकांचा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्याच्या कार्यकर्त्यांचे भविष्य पाहून पक्षश्रेष्ठींनी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे विश्वबंधू राय यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.महाराष्ट्र सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे नाव वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये समोर येत आहे. अनेक तपास यंत्रणा आरोपांची चौकशी करत आहेत. अशा परिस्थितीत या आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये खराब होत आहे. त्याचा मतदारांवर चुकीचा प्रभाव पडत आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडना लिहिलेले पत्र 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारण