शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प. बंगालनंतर आता ‘या’ राज्यातही भाजपाला सतावतेय बंडखोरीची चिंता; आमदार फुटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:15 IST

या समितीत आसाम, त्रिपुराचे भाजपा संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देही समिती भाजपा प्रदेशाध्यक्ष माणिक साहा आणि सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेणार आहे.महामारीच्या काळात भाजपा नेत्यांनी अधिक सक्रीय होणं गरजेचे आहे असं पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं.मुकुल रॉय ते नेते आहेत ज्यांनी २०१६ मध्ये ६ काँग्रेस नेत्यांना टीएमसीमध्ये आणलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला(BJP) धक्का दिल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस(TMC)नं त्रिपुरामध्येहीभाजपा बंडखोरांना पक्षात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. भाजपातील बंडखोरांना टीएमसीत घेण्याची जबाबदारी अलीकडेच भाजपातून आलेल्या मुकुल रॉय यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्षातील लोकांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महासचिव बीएल संतोष यांच्या नेतृत्वाखाली एक पथक संघटनात्मक बांधणीसाठी राज्यात पाठवलं आहे.

या समितीत आसाम, त्रिपुराचे भाजपा संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे. ही समिती भाजपा प्रदेशाध्यक्ष माणिक साहा आणि सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, कॅबिनेट सहकारी आणि खासदारांचीही बैठक घेणार आहेत. भाजपा प्रवक्ते नबेंद्रु भट्टाचार्य म्हणाले की, या बैठकींचा उद्दिष्ट संघटन मजबूत करणं आहे. महामारीच्या काळात भाजपा नेत्यांनी अधिक सक्रीय होणं गरजेचे आहे असं पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं.

तसेच त्रिपुराचे लोक जागरूक आहेत. ते बाहेरच्या पक्षांना थारा देणार नाहीत. मुळात या लोकांनी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं केलेला हिंसाचार पाहिला आहे. त्यामुळे टीएमसीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. केंद्रीय नेतृत्वाने पक्षातील नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम पक्षाचे नेतृत्व करत आहेत असं भट्टाचार्य म्हणाले. तर पक्षात कोणतेही मतभेद नाहीत सर्व ठीक आहे असं प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी सांगितले.

मुकुल रॉय मुरलेले राजकारणी

मुकुल रॉय ते नेते आहेत ज्यांनी २०१६ मध्ये ६ काँग्रेस नेत्यांना टीएमसीमध्ये आणलं होतं. तेव्हा काँग्रेसनं त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यानंतर मुकुल रॉय यांनीच त्या ६ आमदारांना भाजपात घेऊन गेले होते. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पुन्हा जिंकल्यानंतर टीएमसीनं घोषणा केली होती की, भाजपाला आव्हान देण्यासाठी आगामी काळात पक्षाचा विस्तार बाहेरच्या राज्यातही केला जाईल.

मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यावर आमदार नाराज

 त्रिपुरा भाजपातील काही आमदार मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यावर नाराज होते. मागील ऑक्टोबरमध्ये हे आमदार दिल्लीत गेले होते. आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा आणि बीएल संतोष यांची भेट घेतली. मुख्यमंत्री बिप्लब देब यांना हटवण्याची मागणी या आमदारांनी केली होती. यातील बहुतांश आमदार हे काँग्रेस आणि टीएमसीतून आलेले आहेत. २०१८ मध्ये हे भाजपात सहभागी झाले. त्यामुळे विचारधारा, पक्ष आणि तत्त्व या आमदारांसाठी नगण्य आहे. दुसऱ्या पक्षांना हे आमदार फोडणं सहज शक्य आहे.  

 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालTripuraत्रिपुरा