शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 19:06 IST

after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect: रविवारी संजय राऊत यांनी सरकारला सल्ला दिल्यानंतर दोनच दिवसांनी फडणवीसांनी सरकारला सल्ला दिला आहे.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार (Mukesh Ambani Security Scare) आढळल्यापासून राज्याच्या राजकारणात स्फोटक घडामोडी घडत आहेत. स्फोटकांचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझेंना (Sachin Vaze) झालेली अटक, त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची झालेली बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले अतिशय गंभीर आरोप यांच्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं असताना विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षानं ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्लागृहमंत्री सचिन वाझेंना गृहमंत्री देशमुख यांनी १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपनं केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थोड्याच वेळापूर्वी दिल्लीत गृह सचिवांची भेट घेतली. पोलीस खात्याच्या बदलांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे पुरावे सचिवांकडे सोपवल्याचं फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलं. राज्य सरकारला आत्मचिंतनाची गरज असल्याचं ते म्हणाले.

सर्व पुरावे बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिलेत, आता योग्य ती कारवाई होईल: देवेंद्र फडणवीससंजय राऊतांनीदेखील दिला होता आत्मचिंतनाचा सल्लाराज्यातील सरकारला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारमधील घटकांनी आत्मपरिक्षण करावं. आपले पाय जमिनीवर आहेत की नाही ते तपासून पाहावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोनच दिवसांपूर्वी सरकारला दिला होता. परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रावर बोलताना त्यांनी हा सल्ला दिला होता. या घटनेमुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. यासंदर्भात अनेकदा मी सामनामधून लिहित असतो. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं.राऊतांनी ट्विट केलेल्या शायरीचा अर्थ काय..?संजय राऊत यांनी रविवारी एक शायरी ट्विट केली होती. 'हमको तो तलाश बस नये रास्तों की है, हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है...' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. राऊत यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा रंगू लागली. याबद्दल विचारलं असता, त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल, असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतMukesh Ambaniमुकेश अंबानीsachin Vazeसचिन वाझेShiv SenaशिवसेनाParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुख