शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू होणार’’

By बाळकृष्ण परब | Updated: November 23, 2020 11:21 IST

Praveen Darekar News : ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देराज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहेत्याचे पडसाद होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येतील या निवडणुकीतील पाचही जागांवर भाजपाचा विजय होईल. तसेच तेथूनचा राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना सुरुवात होईल

मुंबई - अनेक घडामोडींनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवड्यात एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात होत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाही होतील, असे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपानेतेप्रवीण दरेकर यांनी केले आहे.राज्यातील सत्तांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. त्याचे पडसाद होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येतील. या निवडणुकीतील पाचही जागांवर भाजपाचा विजय होईल. तसेच तेथूनचा राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना सुरुवात होईल.औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर हे जालना येथे आले होते. तेथे प्रचारसभा आटोपल्यानंतर दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी राज्यातील सरकार हे जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.तसेच कोरोनाच्या संकटकाळात राज्याची अर्थव्यवस्था नीट हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही, असा टोला भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण