शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

...अन् मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसताना दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 09:00 IST

Bihar CM Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत.

ठळक मुद्देकोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या.एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे.

पटणा – बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची स्थापना होऊन २ महिने उलटले तरी आतापर्यंत कॅबिनेटचा विस्तार आणि विधान परिषदेच्या जागेचा फॉर्म्युलाही ठरला नाही. यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीत माझा मित्र कोण अन् शत्रू कोण? हे माहिती नव्हतं असं विधान केलं. त्याच एनडीएचे सहकारी जीतनराम मांझी यांनी आपलं राजकीय रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उभा राहतो.

मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत. मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती परंतु दबावामुळे मी जबाबदारी स्वीकारली आहे असं पुन्हा नितीश कुमार म्हणाले. जेडीयू प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीत माझे लोक कमी जिंकले तेव्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण मुख्यमंत्री जेडीयू आणि भाजपामुळे झालो आहे. एनडीएमध्ये ५ महिन्यापूर्वी सर्वकाही चर्चा व्हायला हवी होती. कोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.

बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या. भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या. एनडीएत भाजपाची मोठ्या भावाची भूमिका नितीश कुमारांना पटली नाही. यामुळेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्र कोण आणि शत्रू कोण असं विधान केले. माजी मंत्री जेडीयू नेता जयकुमार सिंह यावेळी भाजपातून एलजेपीत आलेले उमेदवार राजेंद्र सिंह यांच्यामुळे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

नितीश कुमार यांच्या निकटचे मानले जाणारे अभय कुशवाहा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात मुरब्बी असलेले नितीश कुमार यांच्याकडून कुठे चूक झाली आणि त्यांचे राजकीय गणित बदलून गेले. परंतु नितीश कुमार आता पुन्हा पक्षाच्या वाढीसाठी कामाला लागले आहेत. बिहारमध्ये जनतेने यंदा असा जनादेश दिला आहे की, एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे. एनडीएकडे १२५ तर महाआघाडीकडे ११० आमदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एमआयएम ५, बसपा १ आणि अपक्ष आमदार आहे. त्यामुळे बिहारमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. जेडीयूचे १७ आमदार आरजेडीमध्ये सहभागी होतील असा दावा केला जात आहे. तर काँग्रेसचेही ११ आमदार एनडीएत जाऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड