शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसताना दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 09:00 IST

Bihar CM Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत.

ठळक मुद्देकोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या.एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे.

पटणा – बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची स्थापना होऊन २ महिने उलटले तरी आतापर्यंत कॅबिनेटचा विस्तार आणि विधान परिषदेच्या जागेचा फॉर्म्युलाही ठरला नाही. यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीत माझा मित्र कोण अन् शत्रू कोण? हे माहिती नव्हतं असं विधान केलं. त्याच एनडीएचे सहकारी जीतनराम मांझी यांनी आपलं राजकीय रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उभा राहतो.

मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत. मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती परंतु दबावामुळे मी जबाबदारी स्वीकारली आहे असं पुन्हा नितीश कुमार म्हणाले. जेडीयू प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीत माझे लोक कमी जिंकले तेव्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण मुख्यमंत्री जेडीयू आणि भाजपामुळे झालो आहे. एनडीएमध्ये ५ महिन्यापूर्वी सर्वकाही चर्चा व्हायला हवी होती. कोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.

बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या. भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या. एनडीएत भाजपाची मोठ्या भावाची भूमिका नितीश कुमारांना पटली नाही. यामुळेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्र कोण आणि शत्रू कोण असं विधान केले. माजी मंत्री जेडीयू नेता जयकुमार सिंह यावेळी भाजपातून एलजेपीत आलेले उमेदवार राजेंद्र सिंह यांच्यामुळे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

नितीश कुमार यांच्या निकटचे मानले जाणारे अभय कुशवाहा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात मुरब्बी असलेले नितीश कुमार यांच्याकडून कुठे चूक झाली आणि त्यांचे राजकीय गणित बदलून गेले. परंतु नितीश कुमार आता पुन्हा पक्षाच्या वाढीसाठी कामाला लागले आहेत. बिहारमध्ये जनतेने यंदा असा जनादेश दिला आहे की, एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे. एनडीएकडे १२५ तर महाआघाडीकडे ११० आमदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एमआयएम ५, बसपा १ आणि अपक्ष आमदार आहे. त्यामुळे बिहारमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. जेडीयूचे १७ आमदार आरजेडीमध्ये सहभागी होतील असा दावा केला जात आहे. तर काँग्रेसचेही ११ आमदार एनडीएत जाऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड