शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

...अन् मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसताना दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

By प्रविण मरगळे | Updated: January 11, 2021 09:00 IST

Bihar CM Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत.

ठळक मुद्देकोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या.एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे.

पटणा – बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची स्थापना होऊन २ महिने उलटले तरी आतापर्यंत कॅबिनेटचा विस्तार आणि विधान परिषदेच्या जागेचा फॉर्म्युलाही ठरला नाही. यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीत माझा मित्र कोण अन् शत्रू कोण? हे माहिती नव्हतं असं विधान केलं. त्याच एनडीएचे सहकारी जीतनराम मांझी यांनी आपलं राजकीय रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उभा राहतो.

मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत. मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती परंतु दबावामुळे मी जबाबदारी स्वीकारली आहे असं पुन्हा नितीश कुमार म्हणाले. जेडीयू प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीत माझे लोक कमी जिंकले तेव्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण मुख्यमंत्री जेडीयू आणि भाजपामुळे झालो आहे. एनडीएमध्ये ५ महिन्यापूर्वी सर्वकाही चर्चा व्हायला हवी होती. कोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.

बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या. भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या. एनडीएत भाजपाची मोठ्या भावाची भूमिका नितीश कुमारांना पटली नाही. यामुळेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्र कोण आणि शत्रू कोण असं विधान केले. माजी मंत्री जेडीयू नेता जयकुमार सिंह यावेळी भाजपातून एलजेपीत आलेले उमेदवार राजेंद्र सिंह यांच्यामुळे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

नितीश कुमार यांच्या निकटचे मानले जाणारे अभय कुशवाहा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात मुरब्बी असलेले नितीश कुमार यांच्याकडून कुठे चूक झाली आणि त्यांचे राजकीय गणित बदलून गेले. परंतु नितीश कुमार आता पुन्हा पक्षाच्या वाढीसाठी कामाला लागले आहेत. बिहारमध्ये जनतेने यंदा असा जनादेश दिला आहे की, एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे. एनडीएकडे १२५ तर महाआघाडीकडे ११० आमदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एमआयएम ५, बसपा १ आणि अपक्ष आमदार आहे. त्यामुळे बिहारमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. जेडीयूचे १७ आमदार आरजेडीमध्ये सहभागी होतील असा दावा केला जात आहे. तर काँग्रेसचेही ११ आमदार एनडीएत जाऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड